शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मॉब लिन्चिंग रोखण्यासाठी 'हे' राज्य कायदा करणार; 5 वर्षांचा तुरुंगवास घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 08:40 IST

जमावाकडून होणाऱ्या हत्या रोखण्यासाठी कठोर कायदा

भोपाळ: देशभरात जमावाकडून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण वाढत आहे. जमावाकडून कायदा हाती घेतला जात असल्यानं सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी मध्य प्रदेश सरकार कठोर कायदा करणार आहे. कथित गोरक्षकांकडून करण्यात येणाऱ्या हत्या रोखण्यासाठी मध्य प्रदेश सरकार विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर करणार आहे. सध्या मध्य प्रदेशात गोवंश हत्या, गोमांस बाळगण्यास बंदी आहे. याशिवाय गोवंशाची वाहतूक करण्यावरही बंदी आहे. मात्र या कायद्यात गोसंरक्षणावरुन होणाऱ्या हिंसेचा किंवा जमावाकडून होणाऱ्या हत्येचा उल्लेख नाही. त्यामुळेच या कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार घडवल्यास, मॉब लिन्चिंग झाल्यास पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.सप्टेंबर 2015 मध्ये उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये अखलाक नावाच्या व्यक्तीची कथित गोरक्षकांनी हत्या केली होती. अखलाक यांच्या घरात गोमांस असल्याच्या संशयावरुन जमावानं त्यांना जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये कथित गोरक्षकांनी अनेकांना मारहाण केली. गोमांस बाळगल्याचा, गोहत्या केल्याचा, गोमांसाची वाहतूक केल्याच्या संशयावरुन जमावानं कायदा हातात घेतल्याचे प्रकार अनेकदा घडले.  

टॅग्स :LynchingलीचिंगMadhya Pradeshमध्य प्रदेश