शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

हृदयद्रावक! पत्नीचं व्रत असल्याने डॉक्टरला झाला उशीर; चिमुकल्याने आईच्या कुशीतच सोडला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 11:43 IST

रुग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी एका निष्पाप चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला आहे.

सरकारने मोठ मोठे दावे करूनही आरोग्य विभागाची यंत्रणा रुळावर येत नाही. ग्रामीण भागात निकृष्ट आरोग्य सेवा लोकांच्या जीवावर बेतल्या आहेत. अनेक ठिकाणी भोंगळ कारभार पाहायला मिळत आहे. अशीच एक संतापजनक घटना आता समोर आली आहे. आरोग्य विभागाचा निष्काळाजीपणा पाहायला मिळाला आहे. रुग्णालयात डॉक्टर नसल्याने उपचाराअभावी एका निष्पाप चिमुकल्याने आपल्या आईच्या कुशीत अखेरचा श्वास घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरने पत्नीचं व्रत असल्याने उशीरा आल्याचं कारण दिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्हेटा देवरी येथील संजय पन्द्रे यांनी आपला पाच वर्षांचा मुलगा ऋषी पन्द्रे याला उपचारासाठी बरगी येथील आरोग्य केंद्रात आणले होते, मात्र तेथे डॉक्टरच नव्हते. आईवडील आणि नातेवाईकांनी आपल्या मुलावर उपचार व्हावेत यासाठी रूग्णालयाच्या दारात थांबून खूप वेळ वाट पाहिली. पण अनेक तास उलटून गेले तरी कोणीच डॉक्टर आले नसल्याने चिमुकल्याने आईच्या कुशीतच जीव सोडला. 

चिमुकल्याचा मृत्यू होऊन अनेक तास उलटून गेले तरी रुग्णालयामध्ये डॉक्टर, बीएमओ कोणीच नव्हते. यामुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी डॉक्टरांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर मुलाचा जीव वाचला असता असं संतप्त नातेवाईकांचं म्हणणं आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्याचे लाखो दावे केले जात असले तरी रुग्णालयाच्या दारातच आईच्या कुशीत 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. 

काही तास रुग्णालयात उशीरा पोहोचलेल्या डॉक्टरांनी उशीरा येण्याचं भलतंच कारण सांगितलं आहे. जे ऐकून धक्काच बसेल. पत्नीचं व्रत असल्याने उशीर झाल्याचं सांगितलं आहे. पण ग्रामीण भागात राहणाऱ्या कुटुंबाने आपल्या चिमुकल्याला कायमचं गमावलं आहे. मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटल