शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

अनोखी निवडणूक; सरपंच पदाचा लिलाव, 44 लाखांची बोली लावणारा झाला गावचा सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 14:30 IST

या बोलीत लावलेले पैसे गावाच्या विकासासाठी वापरले जाणार आहेत.

भोपाळ: सध्या सर्वत्र निवडणुकांचे वातावरण आहे. पुढील वर्षात अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. पण, सध्या मध्य प्रदेशातील एका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेशातील एका गावामध्ये पंचायत सदस्यांनी सरपंच निवडण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली.

सरपंच पदासाठी लिलावमिळालेल्या माहितीनुसार, पंचायतीमधील सदस्यांनी सरपंच पदासाठी मतदान न घेता चक्क लिलाव ठेवला. सरपंच पदासाठी चार जणांनी बोली लावली होती. यामागे गावकऱ्यांचा तर्क असा आहे की, उमेदवार जिंकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पैशांचा वापर करतो. पण, लिलावत असे करू शकणार नाही, शिवाय बोलीतून मिळालेल्या पैशातून गावाचा विकास होईल. तसेच निवडणुकीसाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा आणि तणावही राहणार नाही. ही अनोखी निवडणूक मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील भटौली ग्रामपंचायतीमध्ये झाली आहे. 

44 लाखांची सर्वोच्च बोलीउमेदवारांच्या निवडीसाठी 21 लाख रुपयांपासून बोलीला सुरुवात झाली होती. एक-एक करत उमेदवार बोली लावत होते, पण अखेर 44 लाखांच्या बोलीवर सरपंच पद फायनल झाले. सौभागसिंग यादव 44 लाखांची बोली लावणाऱ्या नवनियुक्त सरपंचाचे नाव आहे. हा लिलाव झाला असला तरी, नियमाप्रमाणे गावात निवडणूक होणारच आहे. 

उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, आता या निवडणूक प्रक्रियेत फक्त सौभागसिंग यादव अर्ज दाखल करले, त्याच्याविरोधात गावातील इरर कुणीही अर्ज दाखल करणार नाही, अशी माहिती गावातील लोकांनी दिली आहे. म्हणजेच आता सौभागसिंगचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूकsarpanchसरपंच