शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयात अडसर, संधीच्या शोधात भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 11:13 IST

मध्य प्रदेशमधून भाजपाची सत्ता गेली असली तरी भाजपाला पुन्हा सरकार स्थापण्याचं स्वप्न पडू लागलं आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला 114, तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळालाया निवडणुकीत सपा आणि बसपासह अपक्ष निर्णायक भूमिका बजावणारमध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे.

भोपाळ- मध्य प्रदेशमधून भाजपाची सत्ता गेली असली तरी भाजपाला पुन्हा सरकार स्थापण्याचं स्वप्न पडू लागलं आहे.  जवळपास 23 तास सुरू असलेली मतमोजणी संपली असून, काँग्रेसला 114, तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळाला आहे. सपा 1, बसपा 2 आणि अपक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सपा आणि बसपासह अपक्ष निर्णायक भूमिका बजावणार आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. भाजपा किंवा काँग्रेस यापैकी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांची सत्ता स्थापनेसाठी अपक्षांवर मदार असणार आहे.काँग्रेसला बहुमतासाठी फक्त 2 जागांची गरज असून, मायावती काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तर भाजपाला सत्तास्थापनेसाठी आणखी सात जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे अपक्ष, बसपा आणि सपा या पक्षांच्या आमदारांना या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावण्याची संधी आहे. त्यामुळे शिवराजसिंह चौहान आणि अमित शाह मध्य प्रदेशमध्ये संख्याबळाची जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात असल्याचीही चर्चा आहे. 

मध्य प्रदेश निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोन्ही नेते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आले आहेत. कमलनाथ यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्याची जास्त शक्यता आहे. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वीच कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष बनवलं होतं, तर मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार ज्योतिरादित्य सिंधियांना कॅम्पेन कमिटीचे अध्यक्षपद दिलं होतं. परंतु मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांपेक्षा कमलनाथ यांचं वजन जास्त आहे. त्यांच्या प्रचार यंत्रणेतील सक्रिय सहभागामुळेच काँग्रेसला मध्य प्रदेशात एवढं मोठं यश मिळाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे राहुल गांधी मुख्यमंत्रिपद कमलनाथ यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. 

    टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018