शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

जबलपूरशी दर्डा यांचे अतूट नाते, कुटुंबीयांनी दिले आरोग्यसेवेत विशेष योगदान : मुख्यमंत्री यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 08:49 IST

जवाहरलाल दर्डा यांच्यासारखे उद्योगमंत्री मध्य प्रदेशला लाभले असते तर चित्र वेगळे असते

जबलपूर :मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सोमवारी जबलपूर येथील सेठ गोविंददास शासकीय जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी डॉ. यादव म्हणाले की, दर्डा यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे जबलपूरशी अतिशय जवळचे नाते होते. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात या शहरात एक वर्ष नऊ महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी या शहरामध्ये आरोग्यसेवा विस्तारासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.

डॉ. यादव म्हणाले की, जवाहरलाल दर्डा यांनी महाराष्ट्राच्या उद्योगक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. मध्य प्रदेशलाही त्यांचासारखा उद्योगमंत्री लाभला असता तर आमच्या राज्यातही चांगली औद्योगिक प्रगती झाली असती. ते पुढे म्हणाले की, काळ बदलला आहे. मध्य प्रदेशात अनेक विकासकामे होत आहेत. जबलपूरसह संपूर्ण महाकौशल वेगाने प्रगती करत आहे. विकासाबाबत सरकार कोणतीही कसूर ठेवणार नाही. मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाममंत्री राकेश सिंह, जबलपूरचे खासदार आशिष दुबे, आमदार अशोक रोहाणी, सुशील तिवारी इंदू, संतोष बरकडे, भाजपचे नगराध्यक्ष रत्नेश सोनकर, ग्रामीण अध्यक्ष राजकुमार पटेल आणि जबलपूर महापालिकेचे अध्यक्ष रिकुंज विज उपस्थित होते. लोकमत मीडिया समूहाचे संचालक अशोक जैन, वरिष्ठ संपादक विकास मिश्रा, लोकमत समाचार नागपूरचे संपादक रवींद्र भजनी व सेठ गोविंददास रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. नवीन कोठारी हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.

जबलपूर तीर्थक्षेत्रासारखेच : देवेंद्र दर्डा

लोकमत मीडिया समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा म्हणाले की, संस्कारशील जबलपूरशी आमचे अतूट नाते आहे. आमच्यासाठी हे शहर तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. याच कारणामुळे लोकमतचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान येथे एक वर्ष नऊ महिने कठोर कारावास भोगला होता. २००४ मध्ये जेव्हा जबलपूरवर आपत्ती आली होती, तेव्हा येथे आयसीयूची उभारणी करण्यात आली. बाबूजी ज्या तुरुंगात होते, तिथे दरवर्षी वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले जाते. देवेंद्र दर्डा म्हणाले की, स्वातंत्र्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाबूजींनी दोन मार्ग निवडले – एक म्हणजे वृत्तपत्र आणि दुसरा म्हणजे राजकारण. वृत्तपत्रासाठी त्यांचा ‘वाचक’ हा मूलमंत्र होता. याच सूत्राला अनुसरून तो वारसा डॉक्टर विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा पुढे चालवत आहेत.

जवाहरलाल दर्डा यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महाराष्ट्रातील विविध खात्यांमध्ये २३ वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी सामाजिक भान राखत लोकहिताची अनेक उल्लेखनीय कामे केली - डॉ. मोहन यादव, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाMadhya Pradeshमध्य प्रदेश