शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 23:48 IST

सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - डिसेंबर २०२५ पर्यंत मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप बाजारात उपलब्ध होतील अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम २०२५ मध्ये केली आहे. ही घोषणा स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही मोदींनी केली होती, ज्यात त्यांनी भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे म्हटले. सेमीकंडक्टर उत्पादन हे भारताच्या 'आत्मनिर्भर भारत' अभियानाचा एक भाग आहे. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकातील मॅक्रो-इकॉनॉमिक स्थिरतेमुळे आज भारत जागतिक अर्थव्यवस्थेत मजबूत स्थितीत आहे. भारत सेमीकंडक्टर, स्पेस आणि इलेक्ट्रिक व्हेइकल्स (ईव्ही) क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी तयार आहे. भारताची पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप यावर्षाच्या अखेरीस बाजारात येईल. भारत १०० देशांमध्ये ईव्ही निर्यात करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे सर्व भारताच्या नवीन पिढीच्या महत्वाकांक्षा दर्शवतात असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही 'मेड इन इंडिया' ६जी वर वेगाने काम करत आहोत. भारत आधीच ५ जी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स (IOT) मध्ये जागतिक नेतृत्व घेण्यासाठी तयार आहे. भारताची डिजिटल क्रांती ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर कमी करत आहे आणि लाखो लोकांसाठी नव्या संधी निर्माण करत आहे. टेलिकॉम क्षेत्र आता शहरी-ग्रामीण विभाजन कमी करून लाखो लोकांना जोडत आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

दरम्यान,  स्पेस टेक्नॉलॉजी आता भारताच्या शासन व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली आहे. ज्यामुळे सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा होत आहे. सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी भारतात २८ ते ९० नॅनोमीटर तंत्रज्ञान वापरून उत्पादन सुरू होईल, ज्यामुळे देशातील विदेशी गुंतवणूक वाढेल आणि उत्पादन क्षमता मजबूत होईल. भारत जगाला मंदीच्या स्थितीतून बाहेर काढू शकतो. पूर्वीच्या सरकारांनी तंत्रज्ञान क्षेत्राकडे दुर्लक्ष केले, पण आता भारत मिशन मोडमध्ये आहे. सेमीकंडक्टर आणि टेलिकॉममधील हे प्रगती भारताला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवतील. भारताने मागील काही वर्षांत डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया यासारख्या योजनांद्वारे मजबूत पाया घातला आहे. आता ६जी आणि सेमिकंडक्टरसारख्या क्षेत्रात पुढे जाणे हे व्हिजन २०४७ च्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडियाtechnologyतंत्रज्ञान