शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर केलेला नाही, माहिती अधिकारातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 18:45 IST

नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचा-यांना कामाला लावले होते, याची माहिती देण्यासही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याचा खुलासा झाला आहे.

नवी दिल्ली, दि. 10 - नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचा-यांना कामाला लावले होते, याची माहिती देण्यासही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याचा खुलासा झाला आहे.नोटाबंदीनंतर जमा झालेल्या नोटा मोजण्यासाठी किती मशिन्स वापरण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळावी यासाठी 10 ऑगस्टला माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्यात आला होता. त्यात बँकांनी जुन्या नोटा मोजण्यासाठी उधारीवरसुद्धा कोणत्या मशिनी घेतल्या नव्हत्या हेही समोर आलं आहे. आरटीआयला उत्तर देताना आरबीआयनं सांगितलं आहे की, आरटीआय अधिनियम, 2005च्या कलम 7(9)नुसार माहिती दिली जाऊ शकत नाही. नोटा मोजण्याचं काम सातत्यानं सुरूच राहिल्यानं त्या कधीपासून मोजण्यास सुरुवात केली हे सांगू शकत नाही, असंही आरबीआय स्पष्ट केलं आहे.30 ऑगस्टच्या रिपोर्टनुसार, 15.28 लाख कोटी म्हणजेच 99 टक्के 500 आणि 1000च्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या होत्या.15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी 16,050 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016ला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी 500 रुपयांच्या 1,716.5 कोटी रुपयांच्या नोटा आणि 1000च्या 685.8 कोटी नोटा चलनात होत्या. ज्यांची किंमत 15.44 लाख रुपये होती. तसेच नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे. तसेच 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटा बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये किती बेहिशोबी काळा पैसा पांढरा झाला याचाही आकडा आपल्याकडे नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत 15.28 लाख कोटी किमतीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. तसेच अधिक तपासानंतर अचूक आकडा हाती येईल, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. मात्र 8 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, तसेच अन्य लाभ होतील असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी