शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर केलेला नाही, माहिती अधिकारातून उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 18:45 IST

नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचा-यांना कामाला लावले होते, याची माहिती देण्यासही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याचा खुलासा झाला आहे.

नवी दिल्ली, दि. 10 - नोटाबंदीनंतर 500 आणि 1000च्या नोटा मोजण्यासाठी मशिनचा वापर करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिली आहे. तसेच नोटा मोजण्यासाठी केंद्रीय बँकांनी किती कर्मचा-यांना कामाला लावले होते, याची माहिती देण्यासही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नकार दिला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याचा खुलासा झाला आहे.नोटाबंदीनंतर जमा झालेल्या नोटा मोजण्यासाठी किती मशिन्स वापरण्यात आल्या होत्या, याची माहिती मिळावी यासाठी 10 ऑगस्टला माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्यात आला होता. त्यात बँकांनी जुन्या नोटा मोजण्यासाठी उधारीवरसुद्धा कोणत्या मशिनी घेतल्या नव्हत्या हेही समोर आलं आहे. आरटीआयला उत्तर देताना आरबीआयनं सांगितलं आहे की, आरटीआय अधिनियम, 2005च्या कलम 7(9)नुसार माहिती दिली जाऊ शकत नाही. नोटा मोजण्याचं काम सातत्यानं सुरूच राहिल्यानं त्या कधीपासून मोजण्यास सुरुवात केली हे सांगू शकत नाही, असंही आरबीआय स्पष्ट केलं आहे.30 ऑगस्टच्या रिपोर्टनुसार, 15.28 लाख कोटी म्हणजेच 99 टक्के 500 आणि 1000च्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या होत्या.15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटांपैकी 16,050 कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016ला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी 500 रुपयांच्या 1,716.5 कोटी रुपयांच्या नोटा आणि 1000च्या 685.8 कोटी नोटा चलनात होत्या. ज्यांची किंमत 15.44 लाख रुपये होती. तसेच नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा जमा झाल्याचे समोर आले होते. आता नोटाबंदीनंतर किती काळा पैसा समोर आला याबाबत आपल्याकडे माहिती नसल्याचे रिझर्व्ह बँकेने एका संसदीय समितीला उत्तर देताना सांगितले आहे. तसेच 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोटा बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये किती बेहिशोबी काळा पैसा पांढरा झाला याचाही आकडा आपल्याकडे नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत 15.28 लाख कोटी किमतीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. तसेच अधिक तपासानंतर अचूक आकडा हाती येईल, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. मात्र 8 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, तसेच अन्य लाभ होतील असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी