शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

लुधियाना गॅस दुर्घटना: कसा पसरला विषारी वायू? कसा गेला ११ जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 16:48 IST

Ludhiana Gas Tragedy: पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विषारी वायू पसरल्याने झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विषारी वायू पसरल्याने झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विषारी वायूने ३० सेकंदांमध्येच लोकांचा तडफडून मृत्यू झाला. जे लोक बेशुद्ध होऊन रुग्णालयात दाखल झाले होते, त्यांनाही तेव्हा नेमकं काय घडलं हे आठवत नाही आहे. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी ते रुग्णालयात दाखल असल्याचे पाहिले. दुसरीकडे एनडीआरएफच्या एअर क्वालिटी सेंसरने या परिसरामध्ये हायड्रोजन सल्फाइडचं प्रमाण अधिक असल्याच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा गॅस एवढा घातक असतो की, त्याच्या संपर्कात ३० सेकंदाहून अधिक राहिल्यास माणसाचा मृत्यू होतो. वायूगळती झाल्यानंतर ग्यासपूरामध्ये तेच चित्र होते.

गॅसच्या प्रभावामुळे बेशुद्ध होऊन रुग्णालयात पोहोचलेल्या स्थानिक रहिवासी नितीन याने सांगितले की, श्वास गुदमरल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर तो एका दुकानामध्ये होता. तिथे एक महिलासुद्धा होती. मात्र ती आता कुठे आहे हे माहिती नाही.  दोन्ही पीडित या दुर्घटनेतून सुदैवाने बचावले, त्यानंतर त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. हायड्रोजन सल्फाइड गॅस या भागात कसा पोहोचला हे कळलेलं नाही. मात्र या दुर्घटनेसाठी नाल्यामध्ये केमिकल सोडणारे कारखाने जबाबदार आहेत. नाल्यामध्ये केमिकल मिसळल्याने हायड्रोजन सल्फाइड गॅस तयार होण्याची शक्यता वाढते.

एका मीडिया रिपोर्टनुसार ग्यासपुरा परिसरामध्ये सुमारे ४० हून अधिक फॅक्टरींमध्ये अशा प्रकारच्या केमिकलचा लपूनछपून वापर करतात. बहुतांश कारखान्यांकडे वॉटर ट्रिटमेंट प्लँट नाही आहे. ही विषारी द्रवे गुपचूप नाल्यामध्ये सोडली जातात.

या कारखान्यांमधून रात्री १ वाजण्याच्या सुमारास रसायने नाल्यामध्ये सोडली जायची. ही रसायने दीड ते दोन तासांमध्ये बुढ्ढे नाल्यामध्ये पोहोचून शहराबाहेर जायची. मात्र रविवारी काही कारखान्यांनी हे रसायनयुक्त पाणी सकाळी साडे सहा वाजता सोडले. ही दुर्घटना त्यामुळेच घडली, असं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Punjabपंजाब