शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लुधियाना गॅस दुर्घटना: कसा पसरला विषारी वायू? कसा गेला ११ जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 16:48 IST

Ludhiana Gas Tragedy: पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विषारी वायू पसरल्याने झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विषारी वायू पसरल्याने झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विषारी वायूने ३० सेकंदांमध्येच लोकांचा तडफडून मृत्यू झाला. जे लोक बेशुद्ध होऊन रुग्णालयात दाखल झाले होते, त्यांनाही तेव्हा नेमकं काय घडलं हे आठवत नाही आहे. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी ते रुग्णालयात दाखल असल्याचे पाहिले. दुसरीकडे एनडीआरएफच्या एअर क्वालिटी सेंसरने या परिसरामध्ये हायड्रोजन सल्फाइडचं प्रमाण अधिक असल्याच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा गॅस एवढा घातक असतो की, त्याच्या संपर्कात ३० सेकंदाहून अधिक राहिल्यास माणसाचा मृत्यू होतो. वायूगळती झाल्यानंतर ग्यासपूरामध्ये तेच चित्र होते.

गॅसच्या प्रभावामुळे बेशुद्ध होऊन रुग्णालयात पोहोचलेल्या स्थानिक रहिवासी नितीन याने सांगितले की, श्वास गुदमरल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर तो एका दुकानामध्ये होता. तिथे एक महिलासुद्धा होती. मात्र ती आता कुठे आहे हे माहिती नाही.  दोन्ही पीडित या दुर्घटनेतून सुदैवाने बचावले, त्यानंतर त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. हायड्रोजन सल्फाइड गॅस या भागात कसा पोहोचला हे कळलेलं नाही. मात्र या दुर्घटनेसाठी नाल्यामध्ये केमिकल सोडणारे कारखाने जबाबदार आहेत. नाल्यामध्ये केमिकल मिसळल्याने हायड्रोजन सल्फाइड गॅस तयार होण्याची शक्यता वाढते.

एका मीडिया रिपोर्टनुसार ग्यासपुरा परिसरामध्ये सुमारे ४० हून अधिक फॅक्टरींमध्ये अशा प्रकारच्या केमिकलचा लपूनछपून वापर करतात. बहुतांश कारखान्यांकडे वॉटर ट्रिटमेंट प्लँट नाही आहे. ही विषारी द्रवे गुपचूप नाल्यामध्ये सोडली जातात.

या कारखान्यांमधून रात्री १ वाजण्याच्या सुमारास रसायने नाल्यामध्ये सोडली जायची. ही रसायने दीड ते दोन तासांमध्ये बुढ्ढे नाल्यामध्ये पोहोचून शहराबाहेर जायची. मात्र रविवारी काही कारखान्यांनी हे रसायनयुक्त पाणी सकाळी साडे सहा वाजता सोडले. ही दुर्घटना त्यामुळेच घडली, असं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Punjabपंजाब