शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लुधियाना गॅस दुर्घटना: कसा पसरला विषारी वायू? कसा गेला ११ जणांचा बळी, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 16:48 IST

Ludhiana Gas Tragedy: पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विषारी वायू पसरल्याने झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पंजाबमधील लुधियाना येथील ग्यासपुरा येथे रविवारी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास विषारी वायू पसरल्याने झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विषारी वायूने ३० सेकंदांमध्येच लोकांचा तडफडून मृत्यू झाला. जे लोक बेशुद्ध होऊन रुग्णालयात दाखल झाले होते, त्यांनाही तेव्हा नेमकं काय घडलं हे आठवत नाही आहे. जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी ते रुग्णालयात दाखल असल्याचे पाहिले. दुसरीकडे एनडीआरएफच्या एअर क्वालिटी सेंसरने या परिसरामध्ये हायड्रोजन सल्फाइडचं प्रमाण अधिक असल्याच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे. तज्ज्ञांच्या मते हा गॅस एवढा घातक असतो की, त्याच्या संपर्कात ३० सेकंदाहून अधिक राहिल्यास माणसाचा मृत्यू होतो. वायूगळती झाल्यानंतर ग्यासपूरामध्ये तेच चित्र होते.

गॅसच्या प्रभावामुळे बेशुद्ध होऊन रुग्णालयात पोहोचलेल्या स्थानिक रहिवासी नितीन याने सांगितले की, श्वास गुदमरल्यामुळे तो बेशुद्ध पडला होता. त्यानंतर तो एका दुकानामध्ये होता. तिथे एक महिलासुद्धा होती. मात्र ती आता कुठे आहे हे माहिती नाही.  दोन्ही पीडित या दुर्घटनेतून सुदैवाने बचावले, त्यानंतर त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. हायड्रोजन सल्फाइड गॅस या भागात कसा पोहोचला हे कळलेलं नाही. मात्र या दुर्घटनेसाठी नाल्यामध्ये केमिकल सोडणारे कारखाने जबाबदार आहेत. नाल्यामध्ये केमिकल मिसळल्याने हायड्रोजन सल्फाइड गॅस तयार होण्याची शक्यता वाढते.

एका मीडिया रिपोर्टनुसार ग्यासपुरा परिसरामध्ये सुमारे ४० हून अधिक फॅक्टरींमध्ये अशा प्रकारच्या केमिकलचा लपूनछपून वापर करतात. बहुतांश कारखान्यांकडे वॉटर ट्रिटमेंट प्लँट नाही आहे. ही विषारी द्रवे गुपचूप नाल्यामध्ये सोडली जातात.

या कारखान्यांमधून रात्री १ वाजण्याच्या सुमारास रसायने नाल्यामध्ये सोडली जायची. ही रसायने दीड ते दोन तासांमध्ये बुढ्ढे नाल्यामध्ये पोहोचून शहराबाहेर जायची. मात्र रविवारी काही कारखान्यांनी हे रसायनयुक्त पाणी सकाळी साडे सहा वाजता सोडले. ही दुर्घटना त्यामुळेच घडली, असं सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :Punjabपंजाब