शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

"समाजवादी पक्षानं पोसलेल्या गुन्हेगार-माफियांना समूळ नष्ट करू", योगी आदित्यनाथ यांचा थेट इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 12:38 IST

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये बसपा आमदार राजूपाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येनंतर राज्य सरकारनं आता थेट इशारा दिला आहे.

लखनौ-

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये बसपा आमदार राजूपाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येनंतर राज्य सरकारनं आता थेट इशारा दिला आहे. स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात लक्ष टाकलं आहे आणि संपूर्ण माहिती घेतली आहे. ते म्हणाले की शनिवारी याप्रकरणी सदनात चर्चा झाली आणि याचा मास्टरमाईंड सध्या यूपीच्या बाहेर आहे. पण काही चिंतेची बाब नाही. आम्ही यूपीतील गुन्हेगार आणि माफियांना समूळ नष्ट करुन टाकू. तसंच समाजवादी पक्षानं गुन्हेगारांना संरक्षण दिल्याचा आरोप आदित्यनाथ यांनी यावेळी केला. 

सपावर हल्ला करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, हे लोक गुन्हेगारीशिवाय काहीही करू शकत नाहीत. हे लोक गुन्हेगारांना संरक्षण देतात. मुख्यमंत्री योगी यांनी प्रयागराज घटनेवर सभागृहात शोक व्यक्त केला. एसपींवर निशाणा साधत ते म्हणाले की, हे लोक गुन्हेगारांना पोसतात. पण त्यांना समूळ नष्ट करण्याचं काम आम्ही करू. या घटनेचा सूत्रधार यूपी बाहेरील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना तिकीट देऊन आमदार, खासदार केलं गेलं असंही ते म्हणाले.

फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीपीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनीही निवेदन दिलं आहे. ही घटना अत्यंत दु:खद असल्याचं त्यांनी सांगितलं. पण आम्ही कुणालाही सोडणार नाही, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार, असं योगी म्हणाले. 

राजुपाल हत्याकांडातील महत्त्वाचा साक्षीदार उमेश पाल याची शुक्रवारी सायंकाळी उशिरा राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उमेश पाल गाडीतून खाली उतरताच हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये उमेश पाल आणि त्याचा अंगरक्षत बंदूकधारी जवानाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या अंगरक्षकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर अखिलेश यादव यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सरकारचे धोरण व हेतू चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

विधानसभेत गरजले मुख्यमंत्रीप्रयागराजच्या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सरकार झीरो टॉलरेन्सच्या धोरणावर काम करत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना त्यांनी एसपींना सवाल केला. ज्या गुन्हेगारांनी ही घटना घडवली त्यांना समाजवादी पक्षाचा आश्रय नाही का? असा सवाल त्यांनी केला. 'सपा'ने त्यांना खासदार केले नाही का? ते म्हणाले की, हे लोक व्यावसायिक माफियांचे आश्रयदाते आहेत.

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा