शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आता घरा-घरात पाइपलाइननं पोहोचणार गॅस; मोठा दिलासा देण्याच्या तयारीत मोदी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 23:34 IST

उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात एलपीजी पोहोचवल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने देशात गॅस पाइपलाइनची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकार एलपीजीसंदर्भात मोठी तयारी करत आहे. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात एलपीजी पोहोचवल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने देशात गॅस पाइपलाइनची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. सोमवारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

आता प्रत्येक घरात पाइपलाइननं पोहोचणार गॅस - पुरी म्हणाले, गॅस पाइपलाइनच्या विस्तारीकरणाच्या कामानंतर, भारतातील 82 टक्के भूभाग आणि 98 टक्के लोकसंख्येला पाइपलाइनद्वारे एलपीजी पुरवठा केला जाईल. गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी आणि त्याच्या विस्तारीकरणाच्या कामासाठीची बोली प्रक्रिया याचवर्षी 12 मेरोजी सुरू केली जाईल. 

देशातील 98 टक्के लोकांना होणार फोयदा - हरदीप सिंग पुरी म्हणाले, 'बोली प्रक्रियेनंतर पायाभूत सुविधांची ब्लू प्रिंट तयार केली जाईल. यासाठी ठराविक वेळ लागतो. बोलीच्या 11व्या फेरीनंतर, 82 टक्क्यांहून अधिक भूभाग आणि 98 टक्के लोकांना एलपीजी पाइपलाइन दिली जाऊ शकेल.'

काही दुर्गम भागांपर्यंत गॅस पाइपलाइन पोहोचू शकणार नाही -डोंगराळ भागांचा उल्लेख करत हरदीप सिंग पुरी म्हणाले, ईशान्येकडील आणि जम्मू-काश्मीरमधील काही दुर्गम भाग  गॅस पाइपलाइनच्या कक्षेत येऊ शकणार नाहीत. तसेच,  एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत पाईप द्वारे येणारा स्वयंपाकाचा गॅस स्वस्त आणि ग्राहकांसाठी अधिक अनुकूल आहे. याच बरोबर, 1,000 एलएनजी स्टेशन प्रस्तावित असून 50 एलएनजी स्टेशन पुढील काही वर्षांत तयार होतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारCylinderगॅस सिलेंडर