शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कांदे, बटाटे, भाज्या कडाडल्या असताना गॅस ग्राहकांना मोठा दिलासा; पण...

By कुणाल गवाणकर | Updated: November 1, 2020 10:53 IST

देशभरात सिलेंडरच्या किमती स्थिर; सर्व कंपन्यांकडून घोषणा

नवी दिल्ली: कांदा, बटाट्यासह भाज्यांच्या किमती कडाडल्या असताना सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. याआधी ऑक्टोबरमध्येही एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीनं घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतेही बदल केलेले नव्हते. सध्या भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या दरानंही सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अशा परिस्थितीत सिलेंडरच्या किमती स्थिर असल्यानं जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. मात्र व्यवसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात ७८ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात. याआधी जुलैमध्ये १४ किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दरात ४ रुपयांची वाढ झाली होती. तर अनुदान नसलेल्या सिलेंडरचे दर दिल्लीत ११.५० रुपयांनी वाढले होते. ...तर आजपासून तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही; जाणून घ्या नवे नियमदेशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीनं संकेतस्थळावर सिलेंडरचे नवे दर प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये असलेले दर नोव्हेंबरमध्येही लागू असतील. मुंबईत बिगर अनुदानित सिलेंडरची किंमत ५९४ रुपये आहे. दिल्लीतही सिलेंडरचा दर ५९४ रुपयेच आहेत. चेन्नईत मात्र सिलेंडरसाठी ६१० रुपये मोजावे लागत आहेत. कोलकात्यात सिलेंडरचा दर ६२० रुपये इतका आहे.आजपासून सिलेंडर, एसबीआय, डिजिटल पेमेंटचे नियम बदलणार; जाणून घ्या नवे नियमनोव्हेंबरमध्ये व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. चेन्नईत सिलेंडरच्या किमतीत सर्वाधिक ७८ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सिलेंडरचा दर १ हजार ३५४ वर गेला आहे. मुंबई आणि कोलकात्यात सिलेंडरचा दर ७६ रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे मुंबईत सिलेंडरसाठी १ हजार १८९ रुपये, तर कोलकात्यात १ हजार २९६ रुपये मोजावे लागतील. दिल्लीत व्यवसायिक सिलेंडरचा दर १ हजार २४१ रुपये आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर