शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

'प्रेमी जोडपे अशी गळाभेट घेतात जणू खाऊन टाकतील, त्यांना तुरूंगात टाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 17:48 IST

मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डन प्रेमी जोडपे सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपे एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरूणी किंवा तरूण एकमेकांना खाऊन टाकतील

भरतपूर(राजस्थान), दि. 21 - सातत्याने वादग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. सार्वजनिकपणे प्रेमाचं प्रदर्शन करणा-या प्रेमी जोडप्यांना तुरूंगात टाकावं असं विधान त्यांनी केलं आहे. 

मोटारसायकल असो, कार असो किंवा गार्डन प्रेमी जोडपे सर्वत्र त्यांच्या प्रेमाचं प्रदर्शन करताना दिसतात. प्रेमी जोडपे एकमेकांची अशी गळाभेट घेतात जणू ती तरूणी किंवा तरूण एकमेकांना खाऊन टाकतील असं उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथून लोकसभेचे खासदार असलेले साक्षी महाराज म्हणाले. राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना साक्षी महाराज म्हणाले, काही चुकीचं घडण्याआधी अशा जोडप्यांवर कारवाई करून त्यांना तुरूंगात टाकायला पाहिजे असं ते म्हणाले. प्रेमी जोडप्यांच्या अशा कृत्यांकडे सर्वजण दुर्लक्ष करतात पण बलात्कार झाल्यावर पोलिसांकडे कारवाई करण्याची मागणी केली जाते. 

यापूर्वी साक्षी महाराजांनी बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगचा बचाव केला होता.   

काय म्हणाले होते राम रहीमच्या बचावात- बलात्कार प्रकरणी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला कोर्टाने दोषी ठरविल्यानंतर डेरा प्रमुखाची पाठराखण करण्यासाठी भाजपचे खासदार साक्षी महाराज पुढे सरसावले होते. हे प्रकरण म्हणजे भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे असे साक्षी महाराज यांनी म्हटले. 'कुण्या एकाच व्यक्तीने बाबा राम रहीम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलाय, मात्र करोडो लोक त्यांना देव मानत आहेत', अशा शब्दात साक्षी महाराज यांनी दोषी ठरविण्यात आलेल्या बाबा राम रहीमचा बचाव केला.राम रहीमचा बचाव करताना भाजप खासदार साक्षी महाराज पुढे म्हणाले की, कोर्ट करोडो भक्त काय म्हणतात ते ऐकत नाही, केवळ एका तक्रारदाराचे म्हणणे मात्र एकते. मग एक तक्रारदार बरोबर आहे की, करोडो भक्त?. कोर्टाने साधा माणूस असलेल्या राम रहीमला बोलावले, याचा अर्थ झालेल्या नुकसानीला कोर्टही जबाबदार आहे.भाजपचे आणखी एक नेता आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनीही नाव न घेता बाबा राम रहीमचा बचाव केला होता. स्वामींनी ट्विटद्वारे , 'साधूंसाठी नवी धमकी: राजनेता आणि आश्रमांमध्ये राहणारे साधू स्वामीजींना तुरूंगात पाठवून आश्रमातील संपतीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत. साधूंनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांना ताकद दिली पाहिजे.'असं म्हटलं होतं.