शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही 'कमळ' धोक्यात; लालू-नितीश येणार एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 12:29 IST

याआधी रधुवंश सिंह यांनी असाच दावा केला होता. भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे राजद सोबत जाण्यास नितीश यांची हरकत नाही, असंही त्यांनी नमूद केले होते.

नवी दिल्ली - महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवत शिवसेनेने आपला जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपला डावलून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. याचे पडसाद देशातील इतर राज्यातही उमटण्याची शक्यता आहे. याचेच पडसाद बिहारमध्ये उमटण्याची शक्यता असून कमळ अडचणीत येणार अशी चर्चा सुरू झाली आहे. 

राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी दावा केला की, महाराष्ट्रातील राजकारणाचा साईड इफेक्ट बिहारच्या राजकारणावर होऊ शकतो.  लवकरच बिहारमध्ये राजकीय भूकंप होईल. त्याचे कारण म्हणजे जेडीयू आणि आरजेडी यांच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. तसेच जेडीयूला आमच्यासोबत येण्यास काही अडचण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

याआधी रधुवंश सिंह यांनी असाच दावा केला होता. भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे राजद सोबत जाण्यास नितीश यांची हरकत नाही, असंही त्यांनी नमूद केले होते.

2015 मध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयूने सत्ता देखील स्थापन केली होती. मात्र नितीश कुमार यांनी 2017 मध्ये भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. आता महाराष्ट्रातील घडामोडींमुळे बिहारचे राजकारण तापले आहे. पुढील वर्षी बिहारमध्ये निवडणूक होणार आहे. देशातील बदलेली स्थिती पाहता जदयू-राजद सोबत येऊ शकतात चर्चांना उधाण आले आहे.