शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

द्रष्टा उद्योगपती, सच्चा देशभक्त गमावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 11:38 IST

व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत -ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगताची अपरिमित हानी झाली आहे. ते केवळ द्रष्टे उद्योगपती नव्हते तर सच्चे देशभक्त होते. सामाजिक हितासाठी ते आपल्या उक्ती आणि कृतीतून आयुष्यभर झटत राहिले. त्यांनी कायम सत्याची कास धरली. वैयक्तिक लाभ, स्वार्थापलीकडे जाऊन त्यांनी देशविकासासाठी कार्य केले. संसदेत ते माझे सहकारी होते. पक्षीय राजकारणाचा विचार न करता राष्ट्रहितासाठीचे परखड विचार त्यांनी कायम मांडले.

व्यक्ती आणि सत्ता यांचा विचार न करता ते आपली भूमिका नेहमीच ठामपणे मांडत असत. आपल्या देशाला आगळ्या बौद्धिक उंचीवर पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वर्ल्ड थिंक टँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे ते महत्त्वाचे घटक होते. ‘पुणे लोकमत’च्या वास्तू लोकार्पण सोहळ्यात त्यांनी विशेष अतिथी या नात्याने व्यासपीठ भूषविले होते. तेव्हा त्यांनी व्यक्त केलेले विचार आजही माझ्या स्मरणात आहेत. अतिशय बहुमोल, चिंतनीय आणि दिशादर्शक वैचारिक भूमिका अत्यंत खुलेपणाने थेट शब्दांत त्यांनी मांडली होती.

जमनालालजी बजाज, कमलनयनजी बजाज आणि राहुल बजाज या तीनही पिढ्यांचे दर्डा परिवाराशी फार जिव्हाळ्याचे संबंध होते. राहुल बजाज यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांची मुले राजीव, संजीव आणि सुनयना यांच्यासह सर्व परिवाराला मिळावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या निधनाने लोकमत परिवाराने एक ज्येष्ठ आप्त आणि सच्चा हितचिंतक गमावला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलVijay Dardaविजय दर्डा