शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

'आगे आगे देखो होता है क्या'... मसूद अजहरवरील कारवाईनंतर मोदी बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 22:49 IST

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देर आए दुरुस्त आए' म्हणत संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले आहेत. दहशतवादविरोधी लढ्याबाबत भारताला मिळालेलं हे मोठं यश आहे. तसेच, हा नवीन भारत असून 130 कोटी देशवासीयांचा आवाज जगभरात ऐकला जातो. आता, भारताकडे दुर्लक्ष करता येत नाही. ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या..., असे म्हणत मोदींनी मसूद अजहरबाबत संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. 

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला होता. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडथळे येत होते. मात्र, अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यानंतर, अखेर आज अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पाकिस्तानात लपून बसलेल्या अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

पंतप्रधान मोदींनी अजहरवरील कारवाईचे स्वागत करताना पुन्हा एकदा एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत दहशवादाविरुद्ध भारताची लढाई जोरात सुरू असल्याचे म्हटले. देशातील 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक शक्तीचे हे प्रतिक असल्याचे मोदींनी म्हटले. आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. देशात सध्या आत्मविश्वासाचं वातावरण असून कुठल्याही राजकीय पक्षाने या वातावरणात बाधा आणू नये, असे आवाहनगी मोदींनी केले. जगातील बहुतांश देश आज भारताच्या पाठिशी उभे असून मी त्यांचे आभार मानतो. संयुक्त राष्ट्राच्या निर्णयानंतर पाकिस्तामधील जागरुक नागरिक तेथील सरकारवर आणखी दबाव टाकतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmasood azharमसूद अजहरterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानElectionनिवडणूकunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ