शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

'आगे आगे देखो होता है क्या'... मसूद अजहरवरील कारवाईनंतर मोदी बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 22:49 IST

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देर आए दुरुस्त आए' म्हणत संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले आहेत. दहशतवादविरोधी लढ्याबाबत भारताला मिळालेलं हे मोठं यश आहे. तसेच, हा नवीन भारत असून 130 कोटी देशवासीयांचा आवाज जगभरात ऐकला जातो. आता, भारताकडे दुर्लक्ष करता येत नाही. ही तर सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या..., असे म्हणत मोदींनी मसूद अजहरबाबत संयुक्त राष्ट्राने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. 

भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या लढ्याला आज मोठे यश मिळाले आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रांनी आज आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला होता. त्यामुळे मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात अडथळे येत होते. मात्र, अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले होते. त्यानंतर, अखेर आज अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले. पाकिस्तानात लपून बसलेल्या अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

पंतप्रधान मोदींनी अजहरवरील कारवाईचे स्वागत करताना पुन्हा एकदा एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करत दहशवादाविरुद्ध भारताची लढाई जोरात सुरू असल्याचे म्हटले. देशातील 130 कोटी भारतीयांच्या सामूहिक शक्तीचे हे प्रतिक असल्याचे मोदींनी म्हटले. आजचा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. देशात सध्या आत्मविश्वासाचं वातावरण असून कुठल्याही राजकीय पक्षाने या वातावरणात बाधा आणू नये, असे आवाहनगी मोदींनी केले. जगातील बहुतांश देश आज भारताच्या पाठिशी उभे असून मी त्यांचे आभार मानतो. संयुक्त राष्ट्राच्या निर्णयानंतर पाकिस्तामधील जागरुक नागरिक तेथील सरकारवर आणखी दबाव टाकतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केल.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीmasood azharमसूद अजहरterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानElectionनिवडणूकunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ