शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

पाकिस्तानात जोवर दहशतवादी असतील, तोवर त्यांचे तळ उद्ध्वस्त करत राहणार; लष्कराने ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 19:47 IST

आमची लढाई दहशतवादाशी आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.

नवी दिल्ली - आमची लढाई दहशतवादाशी आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुरावे सादर केले. त्यावेळी मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी असलेल्या लष्कराच्या सज्जतेची माहिती दिली. 

मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल म्हणाले की, ''भारतीय लष्कर कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी सज्ज आहोत. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सुंदरबनी,  भिंबर, नौशेरा, कृष्णाघाटी भागात गोळीबार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला परतवून लावण्यात आला.'' 

यावेळी मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सुरक्षितेविषयी देशवासियांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ''भारतीय लष्कराची कुठल्याही आक्रमणाचा सामना करण्याची सज्जता झालेली आहे. तसेच देशात शांतता, स्थैर्य कायमा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमची लढाई ही दहशतवादाशी आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तानात दहशतवादी असतील तोपर्यंत आम्ही त्यांचे तळ उद्ध्वस्त करत राहू,'' असा रोखठोक इशाराच त्यांनी दिला. 

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवानIndiaभारत