शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पाकिस्तानात जोवर दहशतवादी असतील, तोवर त्यांचे तळ उद्ध्वस्त करत राहणार; लष्कराने ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 19:47 IST

आमची लढाई दहशतवादाशी आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे.

नवी दिल्ली - आमची लढाई दहशतवादाशी आहे. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी भूमीमध्ये जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत राहू, असा इशारा भारतीय लष्कराने दिला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या तिन्ही सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत पुरावे सादर केले. त्यावेळी मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी असलेल्या लष्कराच्या सज्जतेची माहिती दिली. 

मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल म्हणाले की, ''भारतीय लष्कर कुठलाही हल्ला परतवून लावण्यासाठी सज्ज आहोत. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सुंदरबनी,  भिंबर, नौशेरा, कृष्णाघाटी भागात गोळीबार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला परतवून लावण्यात आला.'' 

यावेळी मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल यांनी सुरक्षितेविषयी देशवासियांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. ''भारतीय लष्कराची कुठल्याही आक्रमणाचा सामना करण्याची सज्जता झालेली आहे. तसेच देशात शांतता, स्थैर्य कायमा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमची लढाई ही दहशतवादाशी आहे. त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तानात दहशतवादी असतील तोपर्यंत आम्ही त्यांचे तळ उद्ध्वस्त करत राहू,'' असा रोखठोक इशाराच त्यांनी दिला. 

 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकIndian Armyभारतीय जवानIndiaभारत