शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची आहे,सुरूवात अकोल्यातून; मोदी सरकारवर यशवंत सिन्हा पुन्हा कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 14:00 IST

सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात मात्र, आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नाही त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरूप महत्वाचं आहे.

अकोला - देशाच्या अर्थव्यवस्थेवरुन आपल्या लेखातून टीका करणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. माझ्या लेखानंतर आलेल्या प्रतिक्रिया या देशात काही तरी चुकत आहे या स्पष्ट करणाऱ्या आहेत. आता राजशक्ती विरोधात लोकशक्ती उभारायची गरज आहे आणि त्याची सुरूवात अकोल्यातून करत आहोत असं ते म्हणाले. अकोल्यात शेतकरी जागर मंचाच्या वतीने यशवंत सिन्हा यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.  ‘भारतीय अर्थव्यवस्था, नोटाबंदी, जीएसटी व शेतकरी’, या विषयावर त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या नोटबंदीपासून ते जीएसटीपर्यंत विविध मुद्यांवर टीका केली. नोटबंदी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. नवीन रोजगार थांबलाय, कर्मचारी कमी केले जात आहेत आणि आम्ही आमच्याच लोकांना भुलवत ठेवत सरकार चालवत आहोत. सरकारचे नेते आकड्यांचा खेळ करतात आणि मोठे आकडे फेकतात मात्र, आकडेबाजीच्या खेळाने देशाचं भलं होत नाही त्यासाठी जीडीपी हे खरे स्वरूप महत्वाचं आहे. जीएसटीमध्ये दिलेल्या सवलती दिशाभूल करणाऱ्या आहेत, मी सरकारला आवाहन करतो या विसंगती दूर करा अन्यथा देशाच्या अर्थ व्यवस्थेला मोठा धोका निर्माण होईल असं ते म्हणाले. जीएसटी म्हणजे गुड अॅंन्ड सिम्पल टॅक्स नाही तर आता एवढा जटील केला आहे की बॅड अॅन्ड काँप्लिकेटेड टॅक्स झाला आहे अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली. यशवंत सिन्हा हे  माजी केंद्रीय अर्थमंत्री असल्याने त्यांच्या विधानांना गांभीर्याने घेतले जात आहे. 

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारGSTजीएसटीNote BanनोटाबंदीFarmerशेतकरी