शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

शनिवार की सोमवार ? लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त दोन-तीन दिवसांत ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 13:43 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीची घोषणा 5 मार्च रोजी करण्यात आली होती त्यावेळी 9 टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकींची घोषणा करू शकते

नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक 2019 चे बिगुल कधी वाजणार याचीच चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. राजकीय पक्षदेखील निवडणुकीच्या तयारीला लागलेत. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

निवडणूक आयोगाकडून यंदा लोकसभा निवडणूक ही सात ते आठ टप्प्यांमध्ये घेतली जाऊ शकते. निवडणुकीची घोषणा या आठवड्याच्या शेवटी अथवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत राज्यातील निवडणूक आयोगांना पत्र देखील पाठवलं आहे. ज्यामध्ये 2014 निवडणुकीच्या तुलनांमध्ये काही बदल करणे अपेक्षित असेल तर तशा सूचना मागवण्यात येत आहेत. लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या वेळेत बदल करण्याची आवश्यकता वाटत असेल तर त्याबाबत कळवावे असेही पत्रात नमूद केले आहे. 

मागील दोन आठवड्यांपासून केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या तयारीला अंतिम रूप देण्याच्या तयारीला लागले आहे. राज्यातील निवडणूक कार्यालयांकडून आढावा घेण्यात आलेला आहे. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. आयोगाच्या सूत्रांनुसार सर्व तयारी पार पडल्यानंतर 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीची घोषणा केली जाणार आहे. विद्यमान 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपत असल्याने त्या अगोदरची निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल आणि मे महिन्यात मतदानाचे टप्पे पार पाडले जातील. लोकसभा निवडणुकासोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही घेतल्या जाणार आहेत. भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणुकाबाबत अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. 

मागील लोकसभा निवडणुकांचा इतिहास पाहता 2004 मध्ये चार टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. तेव्हा 29 फेब्रुवारी रोजी निवडणुकीची घोषणा केली होती. 2009 मध्ये 2 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा करून पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते. त्यावेळी 16 एप्रिल 2009 रोजी मतदानाचा पहिला टप्पा सुरू झाला होता तर शेवट 13 मे रोजी अखेरचा मतदानाचा टप्पा पार पडला होता. गेल्या लोकसभा निवडणुकींची घोषणा 5 मार्च रोजी करण्यात आली होती त्यावेळी 9 टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्यामुळे आगामी दोन-तीन दिवसांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची घोषणा करू शकते.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ElectionनिवडणूकPoliticsराजकारणJammu Kashmirजम्मू-काश्मीर