शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

'३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'; एस जयशंकर यांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 11:20 IST

S Jaishankar : पाकव्याप्त काश्मिरबाबत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

S Jaishankar On Pok : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पाकिस्तानचा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात गाजत आहे. भाजप आणि काँग्रेसकडून सातत्याने पाकिस्तानचा उल्लेख करत एकमेकांवर टीका केली जातेय. दुसरीकडे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मिरबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. पाकव्याप्त काश्मिरबाबत मोदी सरकारच्या वचनबद्धतेबाबत एस जयशंकर यांनी भाष्य केलं.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकव्याप्त काश्मिरसंदर्भात पाकिस्तानला कडक इशारा दिला. पीओके भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारतात परत आला पाहिजे. यावर संसदेचा प्रस्ताव आहे आणि सर्व राजकीय पक्ष यासाठी वचनबद्ध आहेत, असे एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत असताना परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी सांगितले की, लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरु असताना मोदी सरकारने भारतीय संविधानातील कलम ३७० कसे रद्द केले.

"लोकांनी हे मान्यच केले होते की कलम ३७० बदलता येणार नाही आणि हे स्वीकारले होते. पण एकदा आपण ते बदलले की संपूर्ण वास्तविकता बदलली. पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेत प्रस्ताव आहे. मला एक गोष्ट नक्कीच सांगायची आहे, ती म्हणजे 10 वर्षांपूर्वी किंवा 5 वर्षांपूर्वीही लोक आम्हाला या बाबतीत विचारत नव्हते. पण जेव्हा आम्ही ३७० रद्द केले, आता लोकांना समजले आहे की पाकव्याप्त काश्मीर देखील महत्त्वाचे आहे," असं जयशंकर यांनी म्हटलं.

त्याआधी रविवारी परराष्ट्र मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर कधीही भारताबाहेर जाणार नसल्याचे जाहीर केले होते. ओडिशातील एका कार्यक्रमात बोलताना जयशंकर म्हणाले होते,"पाकव्याप्त काश्मीर या देशाच्या बाहेर कधीच नव्हते. तो या देशाचा एक भाग आहे. पाकव्याप्त काश्मीर पूर्णपणे भारताचा भाग असल्याचा संसदेचा ठराव आहे."

"देशात बदल झाला आहे. गेल्या दहा वर्षांत देशाचा स्वतःबद्दलचा विचार बदलला आहे. आमचा दृष्टिकोन जगासमोर ठेवायला आम्ही आता घाबरत नाही. देशाच्या प्रत्येक भागात असलेले वातावरण पाहता एक प्रकारे आपण काळासोबत वाटचाल करत आहोत. भाजपची विचारधारा राष्ट्रवादी आहे. आपण काश्मीर, चीन, अण्वस्त्रे किंवा इतर देशांबद्दल बोललो. आपली मते मांडताना आपण मागेपुढे पाहत नाही, हे भाजपच्या मनात आहे," असंही एस जयशंकर यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Pakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा