शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लोकसभेची निवडणूक आटोपली, आता व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांचं काय होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 11:59 IST

निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

नवी दिल्ली -  सतराव्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा झालेला वापर त्यावर घेण्यात आलेल्या अनेक शंका याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी शांततेत पार पडली. तसेच संपूर्ण देशभरात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यातील मतांची बेरीज बरोबर जुळल्याने कुठल्याही वादास स्थान राहिले नाही. मात्र आता निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मत नोंदवलेल्या चिठ्ठ्यांचे आणि ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या मतांचे काय होणार, अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम  मशीनसोबतच हजारो व्हीव्हीपॅट मशीनचा वापर देशभरात केला गेला. दरम्यान, मतमोजणी झाल्यानंतर सर्व मत चिठ्ठ्या पुन्हा एकदा व्हीव्हीपॅटमध्ये बंद करण्यात आल्या असून, व्हीव्हीपॅट मशीन सील करण्यात आल्या आहेत. व्हीव्हीपॅटसोबतच सर्व ईव्हीएम मशीनही सीलबंद करण्यात आल्या आहेत. आता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांचा नोंदी मतमोजणीपासून पुढच्या 45 दिवसांपर्यंत सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत.  व्हीव्हीपॅट मशीनमध्ये नोंद झालेल्या मतचिठ्ठ्यांवरील शाई उडून जाऊ नये म्हणून व्हीव्हीपॅट मशीन अंधाऱ्या खोलीत ठेवण्यात आल्या आहेत. तसेच आतील चिठ्ठ्यांचा हवा आणि प्रकाश यांच्याशी संपर्क येऊ नये म्हणून या मशीन सुरक्षित ठेवण्यापूर्वी प्रत्येक मशीन पॉलिथिनच्या काळ्या पिशवीत बंद करण्यात आली आहे. निकालांबाबत कुणाला शंका असल्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन 45 दिवसांपूर्वी हायकोर्टात अपील करण्याची संधी मिळावी म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. 45 दिवस पूर्ण झाल्यावर निकालांबाबत न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांबाबत निवडणूक आयोग हायकोर्टाकडून माहिती घेईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.  या 45 दिवसांत निकालांविरोधात कुणी अपील केल्यास ईव्हीएम आणि व्हीहीपॅट उघडण्यात येतील किंवा सुरक्षित ठेवण्यात येतील. तसे न झाल्यास पुढच्या मतदानासाठी या मशीन तयार करण्याचे काम सुरू करण्यात येईल. एकदा वापर झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीपूर्वी  ईव्हीएमची बॅटरी बदलणे आवश्यक असते. कारण फेरफार करता येऊ नयेत म्हणून निवडणूक प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम पूर्णपणे सील केलेले असते. त्यामुळे एकदा वापरलेली बॅटरी पुन्हा वापरल्यास मतदानादरम्यान ईव्हीएममधील बॅटरी संपण्याची शक्यता असते. मात्र व्हीव्हीपॅटबाबत असे होत नाही. व्हीव्हीपॅटमधील बॅटरी मतदानादरम्यान बदलण्याचा पर्यायही उपलब्ध असतो.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालVVPATव्हीव्हीपीएटीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग