शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

Lok Sabha Election 2019 : चंदौलीमध्ये मतदानाआधीच मतदारांना जबरदस्तीने लावली शाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 11:36 IST

उत्तर प्रदेशातील चांदौली येथील तारा जीवनपूर गावातल्या काही मतदारांनी जबरदस्तीने हाताला शाई लावल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशातील चांदौली येथील तारा जीवनपूर गावातल्या काही मतदारांनी जबरदस्तीने हाताला शाई लावल्याचा आरोप केला आहे.जबरदस्ती शाई लावण्यासोबतच मतदाराच्या हातात 500  रुपयेही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तीन माणसांनी त्यांना शनिवारी  500 रुपयांचे आमिष दाखवलं होतं.

चंदौली - उत्तर प्रदेशातील चांदौली येथील तारा जीवनपूर गावातल्या काही मतदारांनी जबरदस्तीने हाताला शाई लावल्याचा आरोप केला आहे. तीन माणसांनी त्यांना शनिवारी  500 रुपयांचे आमिष दाखवलं होतं. तसेच भाजपाला मत देण्याबद्दल सांगितल्याचा आरोप या मतदारांनी केला आहे. तसेच जबरदस्ती शाई लावण्यासोबतच मतदाराच्या हातात 500  रुपयेही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, चंदौली लोकसभा क्षेत्रातील तारा जीवनपूर गावातील नागरिकांनी भाजपा कार्यकर्त्यांवर मत न देण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. मत देण्यासाठी आम्हाला केवळ पैसेच दिले नाहीत तर मतदान करू नये म्हणून बोटाला शाई देखील लावण्यात आल्याचं नागरिकांनी सांगितलं. तीन माणसांनी त्यांना शनिवारी  500 रुपयांचे आमिष दाखवलं होतं. कोणाला याबद्दल सांगू नका असे म्हणत पाचशे रुपये दिल्याचा आरोपही लोकांनी केला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसेच तक्रारदारांनी मतदानाच्या आधीच जबरदस्तीने हाताच्या बोटावर शाई लावण्यात आली तसेच 500 रुपये देण्यात आल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी रविवारी (19 मे)मतदान होत आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे 10 कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे. मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडेच असेल. राजकीय नेते त्यावर आपली मते व्यक्त करतील. पण २३ मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, त्यांचे नेते व प्रत्यक्ष उमेदवार यांच्या मनात प्रचंड धाकधूक असेल.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान