शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

लोकसभेची आचारसंहिता ६ ते ८ मार्चला लागू?; मोदी करणार ७० दिवसांत ७० योजनांचा धडाका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2018 06:27 IST

निवडणुका घोषित व्हायला व आचारसंहिता लागू व्हायला आता जेमतेम ७0 दिवस शिल्लक असून, ६ ते ८ मार्चच्या दरम्यान निवडणुकांची अधिकृत घोषणा आयोग करेल, असे दिसत आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास आता सुरुवात झाली आहे. निवडणुका घोषित व्हायला व आचारसंहिता लागू व्हायला आता जेमतेम ७0 दिवस शिल्लक असून, ६ ते ८ मार्चच्या दरम्यान निवडणुकांची अधिकृत घोषणा आयोग करेल, असे दिसत आहे. त्यामुळे या ७0 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभराचा दौरा करून ७० नव्या योजना व प्रकल्पांची घोषणा करणार आहेत.रस्तेबांधणीसह सर्व पायाभूत सुविधा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. ती कामे एक लाख कोटी रुपयांची आहेत.काँग्रेसवर हल्ला चढवण्यासाठी मोदी अनेक योजनांची उद्घाटने करतील. तसेच ज्या राज्यांत एम्सची कामे सुरू झाली आहेत, त्यांचे उद्घाटन फेब्रुवारीमध्ये मोदी करतील. पुढील ५0 दिवस ते उद्घाटन, पायाभरणी तसेच नव्या योजना व प्रकल्प यांसाठीच देणार आहेत.नव्या योजना व घोषणा यांसाठी हंगामी अर्थसंकल्पासाठी थांबायलाही मोदी सरकार तयार नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ जानेवारी रोजी आटोपताच, तरुणांना रोजगार, एमएसएमई तसेच अन्य योजना जाहीर करण्यात येतील. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३0 जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात होईल.पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ७0 दिवसांच्या कामाचा आराखडा तयार केला असून, दर दिवशी एक प्रकल्प वा योजना हा त्याचाच भाग असेल. ‘फिर एक बार, मोदी सरकार’ हे भाजपाचे यंदाचे मिशन आहे. मोदी आज, शनिवारी वाराणसीमध्ये तर उद्या पोर्ट ब्लेअरमध्ये आहेत.भाजपाध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली व पीयूष गोयल यांनी २0१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाची योजना तयार केली आहे. ‘फिर एक बार मोदी सरकार’ ही भाजपाची घोषणा निश्चित झाली असली तरी मोदी यांना याहून आकर्षक घोषणा हवी आहे.पीयूष गोयल यांनी देशाच्या विविध भागांमध्ये तीन संस्थांमार्फत जनमत चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या असून, या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तो सर्व्हे सुरू झाला आहे. त्याचे निष्कर्ष व अहवाल जानेवारीच्या दुसºया आठवड्यात मिळतील.याआधी आॅगस्टमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये भाजपाला ३00 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र त्यानंतर लगेचच भाजपाचे बालेकिल्ले म्हणून ओळखल्या जाणाºया उत्तरेकडील तीन राज्यांत पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्या चाचण्यांच्या आधारे नियोजन करण्यात अर्थ नाही, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.दररोज किमान ४० खासदारांशी चर्चाअमित शहा यांनी ३५0 लोकसभा मतदारसंघांत काय रणनीती असावी, या दृष्टीने तयारी सुरू केली असून, रोज ते पक्षाच्या किमान ४0 खासदारांशी चर्चा करीत आहेत. बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशातील खासदारांशी त्यांनी चर्चा पूर्ण केली आहे. तीन राज्यांच्या निकालांनंतर एकाही मतदारसंघात कमी तयारी नसावी, असे त्यांनी ठरविले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक