शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

देवेंद्र फडणवीसांनी 'अशी' केली भाजपाच्या पराभवाची सारवासारव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 18:34 IST

तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. जनताच संपवू शकते.

नवी दिल्लीः राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि एकूणच भाजपाला धडा शिकवणारा आहे, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, असं म्हटलं जातंय. परंतु, हे निकाल म्हणजे भाजपाचा मोठा पराभव आहे, हे मानायलाच भाजपाचे नेते तयार नसल्याचे संकेत आज मिळाले. 'लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड' सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या 'लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह'मध्ये आधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आणि नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांचा खेळ करून पराभवाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

तीन राज्यं भाजपामुक्त कशी म्हणता येतील? राजकारणात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. जनताच संपवू शकते. आमचा पराभव झाला हे मान्य, पण राजस्थानमध्ये तर दर पाच वर्षांनी सरकारं बदलतातच. यावेळी भाजपा आणि काँग्रेसमध्ये फक्त ०.५ टक्के मतांचा फरक आहे. जो जिता वही सिकंदर, पण भाजपाला नाकारलं असं म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांनी यांनी केला. त्यावेळी मुलाखतकार, इंडिया टीव्हीचे एडिटर इन चीफ रजत शर्मा यांनी छत्तीसगडमधील पराभवाकडे त्यांचं लक्ष वेधलं. त्यावर, आम्ही आत्मपरीक्षण करू, असं फडणवीस म्हणाले. काँग्रेसमुक्त भारत याचा अर्थ काँग्रेस पक्षापासून मुक्ती असा नाही, तर काँग्रेसने निर्माण केलेल्या प्रवृत्तीपासून मुक्तता असा होता, असंही त्यांनी सांगितलं. 

गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पटरीवरून उतरलेली गाडी पटरीवर आणली आहे आता ती वेगाने पुढे जाईल, असं सांगत लोकसभेत पुन्हा मोदी सरकारच येईल, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. नोटाबंदी, जीएसटीनंतर ११ राज्यांतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कितीतरी निवडणुका भाजपाने जिंकल्यात. त्यामुळे एक निवडणूक हरल्यावर, आम्ही पुन्हा निवडूनच येणार नाही, असा गोंधळ करणं बरोबर नाही, अशा शब्दांत त्यांनी माध्यमांचेही कान खेचले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNew Delhiनवी दिल्लीLokmat Parliamentary Awards 2018लोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड २०१८