शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राबड़ी देवींचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप ; या प्रश्नांची उत्तरे द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 14:26 IST

सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगाने भाजपबरोबर युती केली असून लाज नसल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप राबड़ी देवींनी लावला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना विरोधीपक्ष नेत्यांकडून ईव्हीएम मशीनबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबड़ी देवी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी देशभरातील स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे याआधी सुद्धा विरोधकांनी निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली होती.

देशभरातील स्ट्रॉंग रूमच्या परिसरात ईव्हीएम मशीन सापडत आहेत. ट्रक आणि खाजगी वाहनात ईव्हीएम मशीन पकडल्या जात आहे. त्या ईव्हीएम मशीन कुठून येत आहे, कोठे जात आहे? त्या कोणासाठी नेल्या जात आहे ? हा पूर्वनियोजित प्रक्रियेचा भाग आहे का? ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर निवडणूक आयोगाने त्वरित द्यावे असे राबड़ी देवी म्हणाल्या. सीबीआय आणि ईडीप्रमाणे निवडणूक आयोगाने भाजपबरोबर युती केली असून लाज नसल्याप्रमाणे त्यांच्यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप राबड़ी देवींनी लावला आहे.

 

ae

तेजस्वी यादव यांना निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे मतदान करता आले नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी राबड़ी देवींनी लावला. मतदाना यादीत तेजस्वी यांच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीचे फोटो लावण्यात आले होते. याबाबत निवडणूक आयोगाने दोषींवर काय कारवाई केली, हा कुणाचा कट होता याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने द्यावे अशी मागणी राबड़ी देवींनी केली.

 

माझी मुलगी रोहिणी मतदानाच्या एक दिवस अगोदर सिंगापुर येथून पटन्यात आली. मात्र मतदान यादीत तिचे नाव वगळण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि भाजपा कार्यकर्त्यांनी सांगावे की मतदान यादीतून नाव कसे हटविण्यात आले? असे राबड़ी देवी म्हणाल्या.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019Tejashwi Yadavतेजस्वी यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव