शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा अध्यक्ष निवडणूक:  राहुल गांधींचा एक फोन अन् ममता बॅनर्जींची नाराजी झाली दूर, इंडिया आघाडीला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 10:14 IST

Lok Sabha Speaker Election: इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ह्या नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी मोर्चा सांभाळत ममता बॅनर्जींशी चर्चा केल्याने ही नाराजी दूर झाली आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपाचं बहुमत हुकल्यानंतर देशातील राजकारणामधील अनेक समिकरणं बदलली आहेत. तसेच आतापर्यंत मागच्या दहा वर्षांत बॅकफूटवर असलेल्या काँग्रेसने आक्रमक चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी लावून धरत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उतरवला आहे. त्यामुळे आज एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडियाचे के. सुरेश यांच्यात लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. मात्र इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ह्या नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोर्चा सांभाळत ममता बॅनर्जींशी चर्चा केल्याने ही नाराजी दूर झाली आहेत. त्यामुळे लोकसभा अध्यक्षपदासाठी होणाऱ्या मतदानापूर्वी इंडिया आघाडीला मोठा दिलासा मिळाल्याचं बोललं जात आहे. 

लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी के. सुरेश यांना उमेदवारी देताना आपलं मत विचारात घेण्यात आलं नाही, असा दावा करत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने पाठिंब्याच्या पक्षावर सहीसुद्दा केली नव्हती. सद्यस्थिती लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचे २३३ खासदार आहेत. त्यात तृणमूल काँग्रेसच्या २९ खासदारांचा समावेश आहे. खासदारांच्या संख्येच्या दृष्टीने ९९ सदस्य असलेल्या काँग्रेसपाठोपाठ तृणमूल हा इंडिया आघाडीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे सभागृहात इंडियासाठी ममता बॅनर्जी यांची साथ महत्त्वाची आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांनी नाराजी दूर करण्याची जबाबदारी स्वत:वर घेत त्यांना फोन लावला. सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेमध्ये ममता बॅनर्जी यांची नाराजी दूर करण्यात  राहुल गांधी यांना यश आलं.

या चर्चेमध्ये के. सुरेश यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्याबाबतची माहिती न दिल्याबद्दल राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसची माफी मागितली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीसाठी आपल्या पक्षाचे दोन प्रतिनिधी पाठवले. मात्र यापेक्षा अधिक चांगला समन्वय आणि संवाद आवश्यक असल्याचेही तृणमूल काँग्रेसकडून ममता बॅनर्जी यांना सुनावण्यात आले. तसेच तृणमूल काँग्रेस पक्ष के. सुरेश यांच्या बाजूने मतदान करेल, असं आश्वासनही तृणमूल कांग्रेसने दिलं.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMamata Banerjeeममता बॅनर्जीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी