शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:02 IST

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भाजपच्या पराभवाचे कारण सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश लोकसभेच्या निकालावरुन सध्या देशभरात चर्चा सुरु झालीय. सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्या पूर्वीचे फैजाबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. ज्या राम मंदिराच्या मुद्दा या निवडणुकीत देशभरात चर्चेत होता तिथेच भाजपचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अयोध्येत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला आणि हा चर्चेचा विषय बनला. अनेकांनी या पराभवाची कारणमीमांसा केली असली तरी समाजवादी पक्षाने त्याचे कारण सांगितले आहे.

अयोध्या मतदारसंघात सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव केला आहे. लल्लू सिंह हे २०१४ पासून या जागेवरून खासदार होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत अवधेश प्रसाद यांनी भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर चार महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. संपूर्ण निवडणूक प्रचारात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र असे असलं तरी भाजपचा अयोध्येत पराभव झाला. यावर आता सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य केले.

"मी अयोध्येतील जनतेचे आभार मानतो. तुम्ही अयोध्येतील लोकांचे दुःख आणि वेदना पाहिल्या असतील. त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नाही. त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची जमीन बाजारभावाच्या बरोबरीने घेतली गेली नाही.  तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतली आहे. तुम्ही पुण्याचे काम करताना गरिबांना उखडून काढत आहात. त्यामुळेच अयोध्या आणि परिसरातील लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ३३ जागांवर विजय मिळवता आला. "उत्तर प्रदेशातील जनतेने मुद्द्यांवर मतदान केले आणि सार्वजनिक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. जिथे सरकार बनवण्याचा किंवा न बनवण्याचा प्रश्न असतो, तिथे सरकार बनते आणि बहुमत नसले तर अनेकांना खूश करून सरकार बनवले जाते," अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादव