शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:02 IST

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भाजपच्या पराभवाचे कारण सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश लोकसभेच्या निकालावरुन सध्या देशभरात चर्चा सुरु झालीय. सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्या पूर्वीचे फैजाबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. ज्या राम मंदिराच्या मुद्दा या निवडणुकीत देशभरात चर्चेत होता तिथेच भाजपचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अयोध्येत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला आणि हा चर्चेचा विषय बनला. अनेकांनी या पराभवाची कारणमीमांसा केली असली तरी समाजवादी पक्षाने त्याचे कारण सांगितले आहे.

अयोध्या मतदारसंघात सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव केला आहे. लल्लू सिंह हे २०१४ पासून या जागेवरून खासदार होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत अवधेश प्रसाद यांनी भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर चार महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. संपूर्ण निवडणूक प्रचारात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र असे असलं तरी भाजपचा अयोध्येत पराभव झाला. यावर आता सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य केले.

"मी अयोध्येतील जनतेचे आभार मानतो. तुम्ही अयोध्येतील लोकांचे दुःख आणि वेदना पाहिल्या असतील. त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नाही. त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची जमीन बाजारभावाच्या बरोबरीने घेतली गेली नाही.  तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतली आहे. तुम्ही पुण्याचे काम करताना गरिबांना उखडून काढत आहात. त्यामुळेच अयोध्या आणि परिसरातील लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ३३ जागांवर विजय मिळवता आला. "उत्तर प्रदेशातील जनतेने मुद्द्यांवर मतदान केले आणि सार्वजनिक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. जिथे सरकार बनवण्याचा किंवा न बनवण्याचा प्रश्न असतो, तिथे सरकार बनते आणि बहुमत नसले तर अनेकांना खूश करून सरकार बनवले जाते," अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादव