शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राम मंदिर असलेल्या अयोध्येत भाजपचा पराभव का झाला? अखिलेश यादव म्हणाले, "पुण्याचे काम करताना जर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 17:02 IST

उत्तर प्रदेशातील अयोध्येत भाजपच्या पराभवाचे कारण सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.

Akhilesh Yadav : उत्तर प्रदेश लोकसभेच्या निकालावरुन सध्या देशभरात चर्चा सुरु झालीय. सर्वात जास्त लोकसभेच्या जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसला आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्या पूर्वीचे फैजाबाद लोकसभा मतदारसंघातही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. ज्या राम मंदिराच्या मुद्दा या निवडणुकीत देशभरात चर्चेत होता तिथेच भाजपचा पराभव झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अयोध्येत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला आणि हा चर्चेचा विषय बनला. अनेकांनी या पराभवाची कारणमीमांसा केली असली तरी समाजवादी पक्षाने त्याचे कारण सांगितले आहे.

अयोध्या मतदारसंघात सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपच्या लल्लू सिंह यांचा पराभव केला आहे. लल्लू सिंह हे २०१४ पासून या जागेवरून खासदार होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत अवधेश प्रसाद यांनी भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर चार महिन्यांनी झालेल्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. संपूर्ण निवडणूक प्रचारात राम मंदिराचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र असे असलं तरी भाजपचा अयोध्येत पराभव झाला. यावर आता सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाष्य केले.

"मी अयोध्येतील जनतेचे आभार मानतो. तुम्ही अयोध्येतील लोकांचे दुःख आणि वेदना पाहिल्या असतील. त्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला गेला नाही. त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची जमीन बाजारभावाच्या बरोबरीने घेतली गेली नाही.  तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची जमीन जबरदस्तीने हिसकावून घेतली आहे. तुम्ही पुण्याचे काम करताना गरिबांना उखडून काढत आहात. त्यामुळेच अयोध्या आणि परिसरातील लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला एकूण ३७ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ३३ जागांवर विजय मिळवता आला. "उत्तर प्रदेशातील जनतेने मुद्द्यांवर मतदान केले आणि सार्वजनिक मुद्द्यांवर निवडणुका झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. जिथे सरकार बनवण्याचा किंवा न बनवण्याचा प्रश्न असतो, तिथे सरकार बनते आणि बहुमत नसले तर अनेकांना खूश करून सरकार बनवले जाते," अशी प्रतिक्रिया अखिलेश यादव यांनी दिली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपाAkhilesh Yadavअखिलेश यादव