शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

अडचणीत आलेल्या रुपी, पीएमसीच्या ठेवीदारांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 06:03 IST

लोकसभेमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली ग्वाही

नवी दिल्ली : रुपी, पीएमसी व गुरू राघवेन्द्र बँकांतील पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना त्यांचे मुदत ठेवीचे पैसे ९० दिवसांत परत मिळतील, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली.डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉपोर्रेशन (संशोधन) हे विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. त्यावेळी चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी रुपी बँकेसारख्या लहान बँकातील पाच लाखांपर्यंतच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवींचे पैसे नव्वद दिवसांत परत मिळतील, असे आश्वासन दिले. सीतारामन म्हणाल्या, देशातील काही छोट्या सहकारी बँका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. त्यातील ठेवीदारांना मुदत ठेवीचे पैसे परत मिळत नाहीत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे, त्यांचा या विधेयकामुळे फायदा होईल.खासदार बापट यांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट! सोमवारी संसदेचे कामकाज सुरू होण्यासाठी पुण्याचे खा. गिरीश बापट यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. खा. बापट म्हणाले, त्यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी येत्या दोन-तीन दिवसांत चर्चा करून विलीनीकरणाचा प्रश्न मार्गी लावू, असे वित्तमंत्र्यांनी सांगितले होते. रुपी बँक विलीनीकरणाच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे बँकेच्या अनेक ठेवीदारांच्या समोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. गेल्या आठ वर्षांत या बँकेने ३०० कोटींचे कर्ज वसूल केले असून सुमारे तेराशे कोटी रुपयांच्या ठेवी बँकेकडे आहेत. लघु वित्तीय बँकेत रूपांतर करण्यासही आमची हरकत नाही. बँकेतील ९९ टक्के ठेवीदारांच्या सातशे वीस कोटी रुपयांच्या ठेवी पाच लाखांच्या आतील आहेत व पाच लाखांवरील ठेवीदारांची संख्या ४ हजार आहे.बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्हावे विलीनीकरण! बँकेची आर्थिक स्थिती सुधारल्याने तिचे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विलीनीकरण करणे योग्य ठरेल. त्याचा बँक ऑफ महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. उलट बँक ऑफ महाराष्ट्राचा व्यावसायिक लाभ होईल, असा दावा मी सीतारामन यांच्याकडे केला. दोन्ही बँकांची मध्यवर्ती कार्यालये पुण्यातच आहेत. त्यांचा ग्राहक वर्ग आणि कार्यपद्धती परस्परांना पूरक आहे. म्हणून आपण रुपी बँकेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती केल्याचेही खा. बापट यांनी सांगितले.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन