शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नेते घरात अन् कार्यकर्ते उन्हात, प्रचारासाठी उमेदवाराने चक्क पुतळाच फिरवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 20:11 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याला लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे.

कोलकाता - लोकसभा निवडणुकांचा प्रचारही उन्हाप्रमाणेच तापल्याचे दिसून येत आहे. देशात काही किरकोळ घटना वगळता पहिल्या तीन टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले आहे. सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होत आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराने चक्क स्वत:चा पुतळाच मतदारसंघात फिरवला आहे. उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तृणमूलचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी यांनी ही शक्कल लढवली आहे.   

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याला लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे. येथील डायमंड हार्बर मतदार संघातून अभिषेक बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात प्रचार करताना त्यांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी चक्क पुतळ्याचा वापर केला आहे. एका जिप्सी कारमध्ये अभिषेक यांचा पुतळा आहे. या जिप्सीतून डायमंड हार्बर मतदार संघात प्रचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या प्रचारात नेत्याचे उन्हापासून संरक्षण होत असले तरी, कार्यकर्त्यांची मात्र उन्हामुळे लाही लाही होत आहे. 

सध्या, पश्चिम बंगालमधील सोशल मीडियावर याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तर, बॅनर्जी यांनी प्रचारासाठी सर्वत्र जाण्यास वेळ नसल्यामुळे हा पुतळा बनविल्याचं म्हटलं आहे. पण, उन्हामुळे त्रास होत असल्याने कार्यकर्त्यांच्या सहभागानेच प्रचार करण्याची ही अनोखी शक्कल असल्याची चर्चा सोशल मीडियात होत आहे. दरम्यान, या मतदारसंघात 19 मे रोजी अंतिम टप्प्यात मतदान होणार आहे. 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकtmcठाणे महापालिकाMamata Banerjeeममता बॅनर्जी