शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 12:31 IST

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं, यात काश्मीरमधील बारामूला लोकसभा मतदार संघातही मतदान झालं.

नवी दिल्ली - संविधानातील कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरात काय बदलले हा प्रश्न कायम विचारला जातो. मात्र या प्रश्नाचं उत्तर सोमवारी मतदानाच्या दिवशी बारामूला परिसरातील जनतेनं दिलं आहे. १९९० च्या दशकापासून दहशतवाद्यांचा गड राहिलेल्या बारामूला भागात ५८.६२ टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्या ४० वर्षातला हा नवा रेकॉर्ड बनला आहे. त्यामुळे कलम ३७० हटवल्यानंतर दहशतवाद्यांच्या गडात लोकशाहीचा झेंडा रोवला आहे.

जम्मू काश्मीरमधील बारामूला लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान झाले. निवडणूक आयोगानुसार याठिकाणी ५८.६२ टक्के मतदान झालं. ही टक्केवारी १९८४ नंतरची सर्वात मोठी आहे. बारामूला भागात १९८४ मध्ये आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान म्हणजे ६१.१ टक्के मतदान झालं. मात्र १९८९ पासून या भागात फुटिरतावाद्यांचे लोण पसरले. त्यामुळे मतदान ५.५ टक्क्यांपर्यंत आलं होते. १९९० च्या दशकापासून उत्तर काश्मीरमधील हा भाग दहशतवाद्यांचा गड मानला जायचा. 

मात्र कलम ३७० हटल्यानंतर पहिल्यांदाच या भागात मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानात सहभाग नोंदवला. दहशतवाद्यांच्या कुटुंबानेही लोकशाही प्रक्रियेत भाग घेतला. याठिकाणी लष्कर ए तोएबामधील दहशतवाद्याच्या भावाने सांगितले की, मतदान माझा अधिकार आहे, त्यासाठी मी मतदान दिले. तर युवकांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. बारामूला भागात मोठ्या प्रमाणात युवक मतदानासाठी मैदानात उतरले असं त्याने सांगितले. 

दरम्यान, बारामूला भागात स्थानिक क्रिकेट खेळाडूंच्या टीमनं क्रिकेट मॅच सोडून सोपोर भागातील सिलू इथल्या मतदान केंद्रावर पोहचले. राज्यात बदल करण्यासाठी आम्ही मतदान केले. मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे. नव्या पिढीला क्रांती हवी असं युवा क्रिकेटरांनी सांगितले. छोटा पाकिस्तान म्हणून ओळख असणाऱ्या सोपोरमध्ये मागील काही दशकांपासून अत्यंत कमी प्रमाणात मतदान झालं आहे. विकासासाठी मतदान गरजेचे आहे. मागील ७० वर्षापासून इथं विकास झाला नाही. त्यामुळे बदल घडायला हवा यासाठी मी पहिल्यांदा मतदान केले असं युवा क्रिकेटर मुअज्जिन मंजूर याने म्हटलं. 

इतकेच नाही तर बारामूला भागात २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु प्रमुख लढत ही ३ उमेदवारांमध्ये आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, पीपुल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन, अवामी इत्तेहाद पार्टीचे शेख रशीद अहमद ज्यांना इंजिनिअर रशीद नावानं ओळखलं जाते त्यांच्यात लढत आहे. सोमवारी इथं मतदानासाठी मोठा उत्साह पाहायला मिळाला. मतदानादिवशी कुठलाही हिंसाचार न घडला लोक मतदानासाठी इतक्या मोठ्या संख्येने बाहेर आल्यानं इतिहास रचला गेला. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४jammu and kashmir lok sabha election 2024जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramulla-pcबारामुल्लाVotingमतदान