शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Rajnath Singh : वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 17:43 IST

Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरकारच्या वन नेशन-वन इलेक्शनच्या प्लॅनचा खुलासा केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारादरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरकारच्या वन नेशन-वन इलेक्शनच्या प्लॅनचा खुलासा केला आहे. आंध्र प्रदेशातील एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, देशात संसद आणि सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, यामुळे खर्चाला आळा बसेल.

राजनाथ सिंह यांनी वन नेशन-वन इलेक्शन यासंदर्भात विधान केलं आहे की, "लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. यापैकी आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत."

काय म्हणाले राजनाथ सिंह?

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, वन नेशन-वन इलेक्शनच्या मागे आमचे पंतप्रधान मोदी यांचा विचार असा आहे की, देशात वारंवार निवडणुका होतात आणि जनता निवडणुकीत तितकीच गुंतलेली राहते. त्यामुळे सारखा सारखा खर्च होतो. तसेच निवडणुका आल्या की आचारसंहिता लागू होते आणि विकासकामेही ठप्प होतात. ही समस्या सोडवण्यासाठी वन नेशन-वन इलेक्शन खूप चांगले माध्यम ठरेल, असा आमचा विश्वास आहे." 

"यावेळेस आंध्र प्रदेशात संसद आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जात आहेत, तर भविष्यात भारतातील सर्व निवडणुकाही एकाच वेळी घ्याव्यात, असा आमचा विचार आहे. आम्ही संसाधने वाचवू आणि वेळेची बचत करू शकू" असं देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. 13 मे रोजी येथील सर्व 25 जागांवर मतदान होणार आहे. याशिवाय आंध्र प्रदेशात विधानसभेच्या जागांसाठीही मतदान होणार आहे. सध्या आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांचे सरकार आहे. भाजपाने येथे टीडीपी आणि जनसेना यांच्यासोबत युती केली आहे. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीOne Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन