शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा? चुरशीची लढत होणार, ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 10:50 IST

लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे.  

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे लागलं आहे. मागील दोन निवडणुकांत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणूक जिंकून विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे, महागाई, बेरोजगारी यांसारखे मुद्दे उपस्थित करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडूनही लोकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच आज निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं, याबाबत टाइम्स नाऊ आणि इटीजी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्व्हे केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे.  टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास ४८ जागांपैकी महायुतीला २७ ते ३१ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. 

मतांची टक्केवारी कशी असेल?

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होत असली तरी दोघांना मिळत असलेल्या मतांमध्ये ६ टक्क्यांचा फरक राहण्याचा अंदाज टाइम्स नाऊ-ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार महायुतीला ४७ टक्के मतं मिळतील, तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मिळण्याचा अंदाज आहे.

राजकीय उलथापालथ आणि बदललेलं समीकरण

महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अनपेक्षितपणे काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र मागील वर्षी जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारही कोसळलं. हे राजकीय वादळ शांत होण्याआधीच यंदा अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध डावलून महायुती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीतही फूट पडली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांना भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षElectionनिवडणूक