शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

महाराष्ट्रात लोकसभेला कोणाला किती जागा? चुरशीची लढत होणार, ताज्या सर्व्हेची अशी आहे आकडेवारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 10:50 IST

लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे.  

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता संपूर्ण देशाचं लक्ष काही महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकडे लागलं आहे. मागील दोन निवडणुकांत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या भाजपचा आगामी निवडणूक जिंकून विजयी हॅट्रिक साधण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसरीकडे, महागाई, बेरोजगारी यांसारखे मुद्दे उपस्थित करत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडूनही लोकांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया या आघाडीत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. अशातच आज निवडणुका झाल्या तर देशातील राजकीय चित्र काय असू शकतं, याबाबत टाइम्स नाऊ आणि इटीजी रिसर्च यांनी संयुक्तपणे एक सर्व्हे केला असून यामध्ये महाराष्ट्रातील जागांबाबतही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न सत्ताधारी एनडीएसह विरोधकांच्या इंडिया आघाडीचा असणार आहे.  टाइम्स नाऊ आणि ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात सध्याच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्यास ४८ जागांपैकी महायुतीला २७ ते ३१ जागा मिळू शकतात, तर महाविकास आघाडीला १७ ते २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसंच इतरांना एक किंवा दोन जागांवर यश मिळेल, असा अंदाज या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. 

मतांची टक्केवारी कशी असेल?

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत होत असली तरी दोघांना मिळत असलेल्या मतांमध्ये ६ टक्क्यांचा फरक राहण्याचा अंदाज टाइम्स नाऊ-ईटीजी रिसर्चच्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार महायुतीला ४७ टक्के मतं मिळतील, तर महाविकास आघाडीला ४१ टक्के मिळण्याचा अंदाज आहे.

राजकीय उलथापालथ आणि बदललेलं समीकरण

महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अनपेक्षितपणे काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना केली. मात्र मागील वर्षी जुलै महिन्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारही कोसळलं. हे राजकीय वादळ शांत होण्याआधीच यंदा अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध डावलून महायुती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीतही फूट पडली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांना भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा सामना बघायला मिळणार आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षElectionनिवडणूक