शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 12:49 IST

Lok Sabha Elections 2024 Arvind Kejriwal And Narendra Modi : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मिळाल्यापासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालभाजपावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. एका मुलाखतीत ते म्हणाले की, भाजपा आम आदमी पक्षाच्या उदयाला घाबरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सातत्याने असे आरोप होत आहेत. याशिवाय गरज पडली तर जेलमधूनही सरकार चालवू, असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे. 

अरविंद केजरीवाल हे देशाचे पहिले मुख्यमंत्री आहेत जे पदावर असताना जेलमध्ये गेले आहेत. ते म्हणाले, "देश अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे. हळूहळू आणि आता अतिशय वेगाने देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. त्यांनी (केंद्रातील भाजपा सरकारने) आधी (झारखंडचे माजी मुख्यमंत्री) हेमंत सोरेन यांना अटक केली आणि नंतर मला अटक केली. केजरीवाल यांना खोट्या खटल्यात अटक करू शकत असाल तर त्यांनी त्यांना घाबरावे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे वागावे, असा संदेश ते देशवासीयांना देत आहेत."

"सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की, मी राजीनामा का देत नाही. लोक माझ्यावर खुर्चीला चिकटून राहिल्याचा आरोप करतात. मी कधीच खुर्ची किंवा पदाचा लोभ दाखवला नाही. मी आयकर आयुक्त असताना माझी नोकरी सोडली आणि दहा दिवस दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये काम केलं."

"यावेळी मी राजीनामा देत नाही कारण हा माझ्या संघर्षाचा भाग आहे. त्यांना (भाजप) असं वाटतं की, की ते केजरीवालांना दिल्लीत पराभूत करू शकत नाहीत. आम्हाला एका वेळी 67 जागा मिळाल्या, तर दुसऱ्या वेळी 62 जागा. त्यामुळेच त्यांनी केजरीवाल यांना खोट्या खटल्यात अडकवले जेणेकरून त्यांचे सरकार पाडता येईल, जर मी आज राजीनामा दिला तर ते ममता बॅनर्जी आणि पिनाराई विजयन यांचे सरकार पाडतील."

"जिथे भाजपा हरेल, त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना अटक करून त्यांचे सरकार पाडले जाऊ शकते. ही लढाई लढावी लागेल. जर त्यांनी लोकशाहीला जेलमध्ये टाकले, तर लोकशाही जेलमधून चालेल. आम्ही पूर्ण ताकदीने याविरोधात लढू. मला किती काळ जेलमध्ये ठेवायचं आहे, याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात" असं देखील अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा