शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

भाजपा नेते टी-शर्टच्या मार्केटिंगमध्ये व्यस्त, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:11 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्या योगी सरकारला वारंवार लक्ष्य करत आहेत. त्यांनी गेल्या 24 तासांत चार ट्विट्स केले आहेत. ज्यात त्यांनी #Sanchibaatबरोबर शेतकरी, शिक्षण मित्र, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मुद्दा उपस्थित करत योगी सरकारला घेरलं आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशमधल्या शिक्षकांचा रोज अपमान होत आहे. अनेक पीडितांनी आत्महत्या केल्या आहेत. जे रस्त्यावर उतरले त्यांच्यावर सरकारनं लाठीचार्ज केला आहे. भाजपा नेते टी-शर्टचं मार्केटिंग करण्यात व्यस्त आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. त्यांनी आधी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मी लखनऊमध्ये अनेक शिक्षकांची भेट घेतली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं मानधन 8470 रुपयांवरून वाढवून 17,000 रुपये करण्याची घोषणा केली होती. परंतु आजमितीस त्यांना वाढीव मानधन प्राप्त झालं नसून त्यांना  8470 रुपयेच पगाराच्या स्वरूपात मिळतात. सरकार खोट्या मुद्द्यांचा प्रचार करत आहे. त्यातच शिक्षकांचा आवाज दडपला जातोय. उत्तर प्रदेशमध्ये अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला हवा. भाजपा सरकारनं त्यांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. माझ्या भगिनींचा संघर्ष हा माझा संघर्ष आहे.उत्तर प्रदेशमध्ये आशा कर्मचारी 9 महिन्यांसाठी एका गर्भवती महिलेच्या स्वास्थ्याची जबाबदारी घेते. त्याचे त्यांना फक्त 600 रुपये मिळतात. भाजपा सरकार त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. त्यांना जुमले नको, तर उत्तर हवं आहे. #Sanchibaatमध्ये प्रियंका गांधींनी ऊस उत्पादकांचा प्रश्नही उपस्थित केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो. परंतु उत्तर प्रदेशचं सरकार त्यांना योग्य मोबदला मिळवून देत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक