शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपा नेते टी-शर्टच्या मार्केटिंगमध्ये व्यस्त, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांचं दुर्लक्ष- प्रियंका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:11 IST

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.

नवी दिल्ली- काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्या योगी सरकारला वारंवार लक्ष्य करत आहेत. त्यांनी गेल्या 24 तासांत चार ट्विट्स केले आहेत. ज्यात त्यांनी #Sanchibaatबरोबर शेतकरी, शिक्षण मित्र, आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांचा मुद्दा उपस्थित करत योगी सरकारला घेरलं आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशमधल्या शिक्षकांचा रोज अपमान होत आहे. अनेक पीडितांनी आत्महत्या केल्या आहेत. जे रस्त्यावर उतरले त्यांच्यावर सरकारनं लाठीचार्ज केला आहे. भाजपा नेते टी-शर्टचं मार्केटिंग करण्यात व्यस्त आहेत, त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नाही. त्यांनी आधी जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मी लखनऊमध्ये अनेक शिक्षकांची भेट घेतली.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं मानधन 8470 रुपयांवरून वाढवून 17,000 रुपये करण्याची घोषणा केली होती. परंतु आजमितीस त्यांना वाढीव मानधन प्राप्त झालं नसून त्यांना  8470 रुपयेच पगाराच्या स्वरूपात मिळतात. सरकार खोट्या मुद्द्यांचा प्रचार करत आहे. त्यातच शिक्षकांचा आवाज दडपला जातोय. उत्तर प्रदेशमध्ये अंगणवाडी शिक्षिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला हवा. भाजपा सरकारनं त्यांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. माझ्या भगिनींचा संघर्ष हा माझा संघर्ष आहे.उत्तर प्रदेशमध्ये आशा कर्मचारी 9 महिन्यांसाठी एका गर्भवती महिलेच्या स्वास्थ्याची जबाबदारी घेते. त्याचे त्यांना फक्त 600 रुपये मिळतात. भाजपा सरकार त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीये. त्यांना जुमले नको, तर उत्तर हवं आहे. #Sanchibaatमध्ये प्रियंका गांधींनी ऊस उत्पादकांचा प्रश्नही उपस्थित केला आहे. ऊस उत्पादक शेतकरी दिवसरात्र मेहनत करतो. परंतु उत्तर प्रदेशचं सरकार त्यांना योग्य मोबदला मिळवून देत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक