शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार! मुंबई, ठाण्यात २० मे राेजी मतदान, ४ जूनला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 06:19 IST

एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: बहुप्रतिक्षित १८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. एकूण ७ टप्प्यांमध्ये होणारी लोकसभा निवडणूक राज्यात प्रथमच पाच टप्प्यांमध्ये होणार आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी १९ आणि २६ एप्रिल, ७, १३ आणि २० मे अशा पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश,  ओडिशा,  सिक्कीम व अरुणाचल प्रदेश या ४  राज्यांच्या विधानसभा आणि विविध राज्यांतील विधानसभेच्या २६ जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

निवडणुकीची वैशिष्ट्ये

  • सुमारे ८३ दिवस निवडणूक प्रक्रिया पार पडेल. ही आजवरची सर्वांत मोठी निवडणूक प्रक्रिया असणार आहे.
  • कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने आऊटर मणिपूर मतदारसंघात दोन टप्प्यांत मतदान होईल.
  • यंदा तब्बल १.८२ काेटी नवमतदार प्रथमच मतदान करतील.
  • मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग व गर्भवती महिला मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, मदत केंद्र. 
  •  

 

  • टप्पा १ - ५ मतदारसंघ - १९ एप्रिल (कंसात २०१९चा विजयी पक्ष)

नागपूर (भाजप), रामटेक (शिवसेना), भंडारा-गोंदिया (भाजप), गडचिरोली-चिमूर(भाजप) आणि चंद्रपूर (काँग्रेस). / भाजप - ३, शिवसेना - १, काँग्रेस - १

  • टप्पा २ - ८ मतदारसंघ - २६ एप्रिल

बुलढाणा (शिवसेना), अकोला (भाजप), अमरावती (अपक्ष), वर्धा (भाजप), यवतमाळ-वाशीम (शिवसेना), हिंगोली (शिवसेना), नांदेड (भाजप) आणि परभणी (शिवसेना). / भाजप - ३, शिवसेना - ४, अपक्ष - १

  • टप्पा ३ - ११ मतदारसंघ - ७ मे

बारामती (राष्ट्रवादी), सोलापूर(भाजप), माढा (भाजप), सांगली(भाजप), सातारा (राष्ट्रवादी), कोल्हापूर (शिवसेना), हातकणंगले (शिवसेना), रायगड (राष्ट्रवादी), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (शिवसेना), उस्मानाबाद (शिवसेना) आणि लातूर (भाजप). / भाजप - ४, शिवसेना - ४, राष्ट्रवादी - ३

  • टप्पा ४ - ११ मतदारसंघ - १३ मे

नंदूरबार (भाजप), जळगाव (भाजप), रावेर (भाजप), जालना (भाजप), औरंगाबाद (एआयएमआयएम), मावळ (शिवसेना), पुणे (भाजप), शिरुर (राष्ट्रवादी), अहमदनगर (भाजप), शिर्डी (शिवसेना) आणि बीड (भाजप). / भाजप - ७, शिवसेना - २, राष्ट्रवादी - १, एआयएमआयएम - १

  • टप्पा ५ - १३ मतदारसंघ - २० मे

धुळे (भाजप), दिंडोरी (भाजप), नाशिक (शिवसेना), पालघर (शिवसेना), भिवंडी (भाजप), कल्याण (शिवसेना), ठाणे (शिवसेना), उत्तर मुंबई (भाजप), उत्तर-पश्चिम मुंबई (शिवसेना), उत्तर-पूर्व मुंबई (भाजप), उत्तर-मध्य मुंबई (भाजप), दक्षिण-मध्य मुंबई (शिवसेना) आणि दक्षिण मुंबई (शिवसेना). / भाजप - ६, शिवसेना - ७

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४ElectionनिवडणूकVotingमतदानthaneठाणेMumbaiमुंबईRaigadरायगड