शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहतील; 'तुफानी' विजयानंतर नरेंद्र मोदींचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 21:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून मिळवलेल्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून मिळवलेल्या विजयानंतर जनतेला संबोधित केलं आहे. मोदी म्हणाले, नव्या भारतासाठी हा जनादेश मिळाला आहे. देशाच्या कोटी कोटी नागरिकांनी या फकीरची झोळी भरली आहे. जगातली ही सर्वात मोठी घटना आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची अखंडता गरजेची आहे. आता देशात फक्त दोनच जाती शिल्लक राहणार आहेत. त्यात एक गरीब असतील, तर दुसरी जात ही गरिबीतून मुक्त करणाऱ्यांसाठी काही ना काही योगदान देणाऱ्याची असेल, असंही मोदी म्हणाले आहेत. निवडणूक आयोग, सुरक्षा यंत्रणांना लोकशाही व्यवस्था सृदृढ करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रिया शांततारीत्या राबवण्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. 130 कोटी नागरिकांनी, जनता जनार्दनानं आम्हाला पुन्हा संधी दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे. पुढे मोदी म्हणाले, स्वतः मेघराज या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी आले आहेत. या देशातील नागरिकांना मान झुकवून मी नमन करतो. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात बऱ्याच लोकसभा निवडणुका झाल्या, पण या वेळी सर्वाधिक मतदान झालं. भारतीय नागरिकांची लोकशाहीप्रति असलेली बांधिलकी यातून व्यक्त होत आहे. भगवान कृष्णासारखा देश उभा आहे. जनतेनं कृष्णासारखं उत्तर दिलं आहे. हा भारताचा विजय आहे. या निवडणुकीत जर कोणी विजयी झालं असेल तर तो भारत असेल. भाजपा संविधान आणि घटनेच्या संरचनेप्रति आम्ही कटिबद्ध आहोत.या निवडणुकीत अनेक चढ-उतार आले, पण आम्ही विनम्रता आणि आदर्शाचा त्याग केलेला नाही. ही निवडणूक कोणताही पक्ष लढत नव्हता, कोणताही उमेदवार लढत नव्हता, कोणताही नेता लढत नव्हता, तर ही निवडणूक देशाची जनता लढत होती. ही लोकशाही बळकट करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, त्यांच्याप्रति मी आभार व्यक्त करतो. आता राजकीय पंडितांना आपली विचारधारा बदलावी लागणार आहे. सध्या 21वं शतक सुरू असून, हा मोदींचा नव्हे, प्रामाणिकपणाचा विजय आहे. आम्ही कधीही मार्गावरून भरकटलो नाही.आदर्शांचा कधीही त्याग केलेला नाही. ना थांबलो, ना वाकलो अन् थकलोसुद्धा नाही. 2014 ते 2019मध्ये धर्मनिरपेक्षतेवर बोलणाऱ्यांचा आवाज बंद झाला. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कोणताही पक्ष जनतेची दिशाभूल करू शकलेला नाही. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाची अखंडता गरजेची आहे. 2024पूर्वीच देशाला प्रगतिपथावर न्यायचा निर्धारही मोदींनी बोलून दाखवला आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपा