शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पूर्व भारतात भाजपची मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:12 IST

हिंदी भाषिक पट्ट्यात कमी होणाऱ्या संभाव्य जागा भरून काढण्यासाठी पूर्व भारतात जोरदार मुसंडी मारण्याची भारतीय जनता पार्टीने आताच्या लोकसभा निवडणुकीत आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचे निकालांवरून दिसते.

- अजित गोगटेहिंदी भाषिक पट्ट्यात कमी होणाऱ्या संभाव्य जागा भरून काढण्यासाठी पूर्व भारतात जोरदार मुसंडी मारण्याची भारतीय जनता पार्टीने आताच्या लोकसभा निवडणुकीत आखलेली रणनीती पूर्णपणे यशस्वी झाल्याचे निकालांवरून दिसते. निकाल येण्याआधी अनेक दिवस हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपला चांगलाच फटका बसेल याची चर्चा सुरु होती. त्यामुळे या भरुन काढण्यासाठी भाजपकडून अन्य राज्यांमध्ये प्रचारात अधिक जोर लावला होता. परंतु तसे घडताना दिसले नाही.हिंदी भाषिक पट्ट्यातील जागांमध्ये अपेक्षेएवढ्या जागा कमी झाल्याच नाहीत. या जागा भाजपने ब-याचअंशी राखल्याच परंतु सोबत पूर्व भारतात गेल्या वेळेपेक्षा जास्त मिळवल्या. या यशामुळेच एकट्या भाजपने लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळविले एवढेच नव्हे तर भाजपने ३०० जागांचा टप्पाही प्रथमच स्वबळावर गाठला.भाजपने सुरुवातीपासूनच पूर्वेकडील राज्यांमध्ये जागा कशा वाढतील, याकडे लक्ष पुरवले होते. परिणामी यावेळी प. बंगाल (१७), बिहार (१५) आणि ओडिशा व आसाम (प्रत्येकी सात) या पूर्वेकडील राज्यांमध्ये तब्बल ५६ जागा नव्यानेच जिंकल्या. तृणमूल काँग्रेससोबत सातही टप्प्यांमध्ये झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये भाजपने यावेळी लक्षणीय यश मिळविले. त्रिपुरातील दोनपैकी दोन व झारखंडमधील १४ पैकी ९ जागाही खिशात घातल्याने भाजपच्या पूर्वेकडील मुसंडीला आणखी बळ मिळाले.देशभरातील एकूण ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपैकी तब्बल १२ राज्यांमध्ये भाजपने सर्वच्या सर्व किंवा बहुसंख्य जागा जिंकल्या आहेत. गुजरात (२६), हरियाणा (१०), दिल्ली (सात), उत्तराखंड (पाच), मणिपूर व चंदिगढ ( प्रत्येकी एक) या राज्यांनी शतप्रतिशत भाजपच्या बाजूने कौल दिला. याखेरीज गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने सत्ता गमवाव्या लागलेल्या छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मोठा विजय मिळवून भाजपने पुन्हा घट्ट पाय रोवला.छत्तीसगढमध्ये ११ पैकी १०, झारखंडमध्ये १४पैकी ९, कर्नाटकमध्ये २८ पैकी २४, मध्य प्रदेशात २९ पैकी २८ व राजस्थानमध्ये २५पैकी २४ जागा जिंकून भाजपाने विरोधकांचा पुरता सफाया केला. गेल्या वेळी सर्वाधिक ७१ जागा जिंकून देणाºया उत्तर प्रदेशात मात्र या पक्षाला यावेळी तब्बल ११ जागा गमवाव्या लागल्या आहेत. भाजपचे राज्यातील सर्वच नेते दावा करीत होते की, उत्तर प्रदेशातील जागा ७१ पेक्षा वाढल्या नाहीत पण त्या कमी नक्कीच होणार नाहीत.एवढे मोठे यश मिळूनही कर्नाटक वगळता उर्वरित दक्षिण भारत व मणिपूर आणि त्रिपूरा वगळता बाकी ईशान्य भारतात मात्र मोदी लाटेचा म्हणावा असा प्रभाव दिसून आला नाही. तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, नागालँड, मिझोराम, मेघालय आणि सिक्कीममध्ये भाजपला खातेही उघडता आले नाही.मिझोरम । मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर२००९ पासून मिझोराम या राज्यात असलेली एकमेव जागा ही काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र आता या जागेवर थेट सामना आहे तो आघाडीवर असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटचे उमेदवार सी लालरोसंगा आणि अपक्ष ललनग्लिोव हमर यांच्यात. त्यात सी लालरोसंगा हे सुमारे ९ हजार मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. या ठिकाणी भाजपा उमेदवाराला २० हजार मतेच मिळवता आली. २००९ आणि २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर सीएल रुआला निवडून आले होते.नागालँड । थोकेओंपुढे काँग्रेसने टेकले हातलोकसभेच्या एका जागेसाठी मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसच्या के.एल.चिशी यांनी ३३ हजार ५३० मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरु ठेवली होती.मात्र ही वाटचाल एनडीपीपीचे (नॅशनालिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) खासदार थोकेओे येप्थॉमी यांनी रोखत १६३४४ मतांची आघाडी घेऊन धक्का दिला. गेल्यावेळी एनपीएचे (नागा पीपल्स फ्रंट) रेफ्यू रियो याठिकाणी निवडणूक आले होते.चिशी आणि येप्थॉमी यांच्यातील लढत चुरशी ठरली.सिक्किम । चामलिंग यांच्या वर्चस्वाला धक्कालोकसभेची एक आणि विधानसभेच्या ३२ जागांवर सत्ताधारी सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे (एसडीएफ) सर्वेसर्वा मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांना धक्का देणारा कल दिसून येत आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे (एसकेएम) इंद्रा सुब्बा यांनी (४६४११) मते घेत एसडीएफच्या डेक बहादूर कटवाल यांना (४० हजार ६१) मागे टाकले आहे.विधानसभेत एसकेएमने १७ तर एसडीएफने १४ जागा जिंकल्या आहेत.एसकेएम आणखी एका जागेवर आघाडीवर आहे.त्रिपुरा । भाजपला लोकसभेतही १०० टक्केत्रिपुरामध्ये गेल्यावर्षी विधानसभेत सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने लोकसभेच्याही दोन्ही जागा जिंकल्या आहेत. त्रिपुरा (पश्चिम) मध्ये प्रतिमा भौमिक तर त्रिपुरा (पूर्व)मध्ये भाजपच्याच रेवती त्रिपुरा यांनी आपला विजय निश्चित केला आहे. या दोन्ही मतदारसंघात कमळ प्रथमच फुलले असून त्रिपुराच्या जनतेने राजघराण्याच्या वारस महाराजकुमारी प्रज्ञा देवबर्मन यांनासुध्दा नाकारले आहे. गेल्या वेळी या दोन्ही मतदारसंघातून माकपचे खासदार होते.मणिपूर । कॉँग्रेसला दोन्ही मतदारसंघात मोठा धक्कामणिपूरमधील दोन्ही जागांवर काँग्रेसच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला आहे. इनर मणिपूरमध्ये भाजपचे डॉ.राजकुमार रंजन सिंह हे काँग्रेसच्या ओईनाम नबाकिशोर सिंह यांच्यापेक्षा पुढे आहेत. तर आऊटर मणिपूरमध्ये नागा पीपल्स फ्र्रंटचे लोफ्रो फेज हे जवळपास ८८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसºया क्रमांकावर भाजपचे उमेदवार हाऊलीम शोखोपाव आहेत. काँग्रेसचे उमेदवार के. जेम्स हे थेट तिसºया क्रमांकावर फेकले गेले आहेत. या दोन्ही मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसचे खासदार होते.मेघालय । अगाथा, व्हिन्सेट पाला यांची दमदार वाटचाल२०१४ च्या मोदी लाटेतही शिलाँगमध्ये आपले वर्चस्व दाखवणाºया काँग्रेसच्या व्हिन्सेट पाला यांनी २०१९ मध्ये पुन्हा एकदा या मतदारसंघात आपला दम दाखवून दिला. त्यांनी अडीच लाखांच्या मतांच्या फरकाने ते सायंकाळपर्यंत आघाडीवर आहेत. तुरा मतदारसंघात अगाथा संगमा यांनीही आपल्या पित्याचा वारसा कायम ठेवला. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. मुकुल संगमा यांच्यावर ६० हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली. या दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार तिसºया क्रमांकावर आहेत.

अरुणाचल । भाजपने केंद्र आणि राज्य जिंकलेअरुणाचल पूर्वमधून भाजपाच्या तापीर गयो यांंनी काँग्रेसच्या लांग्चा वांग्लाट यांच्यावर ६७१७१ मतांची तर अरुणाचल पश्चिममधून भाजपच्या किरन रिजेजृू यांनी काँग्रेसच्या नबाम तुकींवर १२९५८५ मतांनी आघाडी घेतली आहे. तर विधानसभेच्या ६० पैकी २८ जागा मिळवित ३ जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपकडे पुन्हा एकदा सत्ता जाणार आहे. मध्यरात्रीपर्यंत काँग्रेसने २, जनता दल (युनाटेड) ७ तर जागा जिंकल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnorth eastईशान्य भारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९