शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय ?

By meghana.dhoke | Updated: April 28, 2024 11:44 IST

ईशान्य भारतात उर्वरित देशापेक्षा विकास मंदगतीने पोहोचला, पण तिथल्या मतदारांचा उत्साह मात्र लोकशाहीसाठी आश्वासक आहे. देशात सर्वाधिक मतदान ईशान्य भारतीय राज्यांत होतं आणि ही गोष्ट फक्त आजचीच नाही, तर साधारण १९६१ पासून आजवर हेच चित्र आहे.

मेघना ढोके (संपादक, लोकमतसखी. कॉम)

आसाममधल्या चार जागा वगळल्या, तर आसामसह ईशान्य भारतासाठी लोकसभा निवडणूक आता संपलीच आहे. ईशान्य भारतात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत आणि त्यापैकीही १४ जागा एकट्या आसाममध्ये आहेत, म्हणजे वा राज्यांचे लोकसभेतलं प्रतिनिधीत्व अल्प असूनही मतदानाची टक्केवारी मात्र वेगळं चित्र सांगते. देशात सर्वाधिक मतदान ईशान्य भारतीय राज्यांत होतं आणि ही गोष्ट फक्त आजचीच नाही, तर साधारण १९६१ पासून आजवर हेच चित्र आहे.

मग प्रश्न असा आहे की उर्वरित भारतापेक्षा ईशान्य भारतात मतदानाचा टक्का जास्त का दिसतो? अशांतता, आतंकवाद, संप-बंद-मोर्चे, दगली यांनी होरपळणाऱ्या इथल्या माणसांना लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हावं, असं का वाटतं?

आजवरची मतदान आकडेवारी काय सांगते?

ईशान्य भारत : लोकसभेच्या एकूण जागा २५

८०% पेक्षा जास्त मतदान ३० वेळा ईशान्य भारतात झाले,-९२%८४%७८%

विकासाचं वारं अत्यंत मंदगतीनेज्या भागात पोहोचलं तिथली ही माणसं

(आकडेवारी सौजन्य : मतदानसंबंधित विविध बातम्या)वास्तव काय सांगतं?

वास्तव काय सांगतं?

• ज्या राज्यांमध्ये आता कुठे रस्त्यांचं जाळ निर्माण होत आहे. दूर अलगथलग पडलेल्या या भागात मोबाइल नेटवर्क पोहोचत आहेत. आजही एकाच राज्यातल्या दुर्गम भागातल्या दोन गावांत जायचं, तर शेजारच्या राज्यात जाऊन लांब वळसा घालून यावं लागतं है वास्तव आहे, कारण राज्यांतर्गत रस्ते अजूनही कमी आहेत.

• आपल्या राज्याच्या राजधानीतून विमान उडू लागली आणि तिथून केवळ तीन तासांत मुंबई-चेन्नई गाठता येतं याचं अजूनही तिथल्या माणसांना अप्रूप वाटतं, कारण मोठी शहरे गाठायला चार-चार दिवसांचा खडतर प्रवास अनेकांनी केलेला आहे.

• सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवावा, अशी डोळे दिपावणारी व्यवस्था तर तिथंही नाही, मग तरी मतदानाचं प्रमाण जास्त आहे त्याची कारण स्वातंत्र्यानंतर आजवर केंद्रात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं, तरी ती तशीच राहिलेली आहेत. ती बदलत नाही कारण तिकडचे प्रश्न वेगळे आहेत.

मतदान जास्त होण्याची काही कारणं

१) सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ईशान्य भारतात निवडणुका हा एक उत्सव असतो. मत देण्यापासून बहिष्कार टाकण्यापर्यंत आणि प्रचारापासून ते मतदारांना चारचाकीच काय, पण विमानाचं तिकीट देऊन मतदानाला येण्याचं आमंत्रण देण्यापर्यंत. मैदानी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश येथील मतदारांची संख्या,

२)लोकसंख्येची घनता, उमेदवारांशी प्रत्यक्ष असलेली • ओळख आणि समूहानं राहण्याची वृत्ती, हे सारं मतदानाला पूरक ठरते.

३)ईशान्य भारतात सार्वजनिक व्यवहारात महिला जास्त • आघाडीवर दिसतात. त्यामुळे महिला मतदारांचं मतदानाचं प्रमाण जास्त आहे.

४)सरकारी नोकऱ्या हा उत्पन्न आणि जगण्याची सुरक्षितता यासाठीचा मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे. खासगी क्षेत्रापेक्षा आजही सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण आणि त्यावर भरवसा, त्याला असलेलं ग्लॅमर अधिक आहे. सरकारी यंत्रणावर रोजच्या जगण्यात अनेकदा अवलंबून राहाव लागत.

५) विशेषतः ही सर्व राज्य केंद्रावर निधीसाठी अवलंबून असतात, त्यामुळे दिल्लीत ज्याची सत्ता त्याच्याशी जमवून घेणं हा येथील राज्यांचा शिरस्ता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक