शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

ईशान्य भारतात सर्वाधिक मतदान होण्याचे कारण काय ?

By meghana.dhoke | Updated: April 28, 2024 11:44 IST

ईशान्य भारतात उर्वरित देशापेक्षा विकास मंदगतीने पोहोचला, पण तिथल्या मतदारांचा उत्साह मात्र लोकशाहीसाठी आश्वासक आहे. देशात सर्वाधिक मतदान ईशान्य भारतीय राज्यांत होतं आणि ही गोष्ट फक्त आजचीच नाही, तर साधारण १९६१ पासून आजवर हेच चित्र आहे.

मेघना ढोके (संपादक, लोकमतसखी. कॉम)

आसाममधल्या चार जागा वगळल्या, तर आसामसह ईशान्य भारतासाठी लोकसभा निवडणूक आता संपलीच आहे. ईशान्य भारतात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत आणि त्यापैकीही १४ जागा एकट्या आसाममध्ये आहेत, म्हणजे वा राज्यांचे लोकसभेतलं प्रतिनिधीत्व अल्प असूनही मतदानाची टक्केवारी मात्र वेगळं चित्र सांगते. देशात सर्वाधिक मतदान ईशान्य भारतीय राज्यांत होतं आणि ही गोष्ट फक्त आजचीच नाही, तर साधारण १९६१ पासून आजवर हेच चित्र आहे.

मग प्रश्न असा आहे की उर्वरित भारतापेक्षा ईशान्य भारतात मतदानाचा टक्का जास्त का दिसतो? अशांतता, आतंकवाद, संप-बंद-मोर्चे, दगली यांनी होरपळणाऱ्या इथल्या माणसांना लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हावं, असं का वाटतं?

आजवरची मतदान आकडेवारी काय सांगते?

ईशान्य भारत : लोकसभेच्या एकूण जागा २५

८०% पेक्षा जास्त मतदान ३० वेळा ईशान्य भारतात झाले,-९२%८४%७८%

विकासाचं वारं अत्यंत मंदगतीनेज्या भागात पोहोचलं तिथली ही माणसं

(आकडेवारी सौजन्य : मतदानसंबंधित विविध बातम्या)वास्तव काय सांगतं?

वास्तव काय सांगतं?

• ज्या राज्यांमध्ये आता कुठे रस्त्यांचं जाळ निर्माण होत आहे. दूर अलगथलग पडलेल्या या भागात मोबाइल नेटवर्क पोहोचत आहेत. आजही एकाच राज्यातल्या दुर्गम भागातल्या दोन गावांत जायचं, तर शेजारच्या राज्यात जाऊन लांब वळसा घालून यावं लागतं है वास्तव आहे, कारण राज्यांतर्गत रस्ते अजूनही कमी आहेत.

• आपल्या राज्याच्या राजधानीतून विमान उडू लागली आणि तिथून केवळ तीन तासांत मुंबई-चेन्नई गाठता येतं याचं अजूनही तिथल्या माणसांना अप्रूप वाटतं, कारण मोठी शहरे गाठायला चार-चार दिवसांचा खडतर प्रवास अनेकांनी केलेला आहे.

• सरकारी यंत्रणांवर विश्वास ठेवावा, अशी डोळे दिपावणारी व्यवस्था तर तिथंही नाही, मग तरी मतदानाचं प्रमाण जास्त आहे त्याची कारण स्वातंत्र्यानंतर आजवर केंद्रात कुठल्याही पक्षाचं सरकार असलं, तरी ती तशीच राहिलेली आहेत. ती बदलत नाही कारण तिकडचे प्रश्न वेगळे आहेत.

मतदान जास्त होण्याची काही कारणं

१) सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ईशान्य भारतात निवडणुका हा एक उत्सव असतो. मत देण्यापासून बहिष्कार टाकण्यापर्यंत आणि प्रचारापासून ते मतदारांना चारचाकीच काय, पण विमानाचं तिकीट देऊन मतदानाला येण्याचं आमंत्रण देण्यापर्यंत. मैदानी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश येथील मतदारांची संख्या,

२)लोकसंख्येची घनता, उमेदवारांशी प्रत्यक्ष असलेली • ओळख आणि समूहानं राहण्याची वृत्ती, हे सारं मतदानाला पूरक ठरते.

३)ईशान्य भारतात सार्वजनिक व्यवहारात महिला जास्त • आघाडीवर दिसतात. त्यामुळे महिला मतदारांचं मतदानाचं प्रमाण जास्त आहे.

४)सरकारी नोकऱ्या हा उत्पन्न आणि जगण्याची सुरक्षितता यासाठीचा मोठा आणि महत्त्वाचा घटक आहे. खासगी क्षेत्रापेक्षा आजही सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण आणि त्यावर भरवसा, त्याला असलेलं ग्लॅमर अधिक आहे. सरकारी यंत्रणावर रोजच्या जगण्यात अनेकदा अवलंबून राहाव लागत.

५) विशेषतः ही सर्व राज्य केंद्रावर निधीसाठी अवलंबून असतात, त्यामुळे दिल्लीत ज्याची सत्ता त्याच्याशी जमवून घेणं हा येथील राज्यांचा शिरस्ता आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक