शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 05:55 IST

सहावा टप्पा संपताच देशातील २५ राज्यांतील ४२८ मतदारसंघांतील निवडणूक आटोपली आहे. उर्वरित ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत देशात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. प्रत्येकवेळी हिंसाचाराच्या घटना घडणाऱ्या बंगालमध्ये मतदान मात्र भरभरून झाले. शनिवारी आठ राज्यांतील ५८ मतदारसंघांत रात्री ११ वाजेच्या आकडेवारीनुसार ६१.०४ टक्के मतदान झाले. त्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९.३५ टक्के, तर सर्वांत कमी ५४.०३ टक्के मतदान उत्तर प्रदेशमध्ये झाले. पहिल्या तीन टप्प्यांचा अपवाद वगळता बंगालमध्ये चौथ्या टप्प्यापासून सर्वाधिक मतदान होत आहे. 

सहाव्या टप्प्यात सर्वाधिक लक्ष लागले होते ते दिल्लीतील मतदानाकडे. प्रखर उन्हाला न जुमानता दिल्लीत  ७ जागांसाठी मतदान झाले. दरम्यान, सहावा टप्पा संपताच देशातील २५ राज्यांतील ४२८ मतदारसंघांतील निवडणूक आटोपली आहे. उर्वरित ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होईल.

राजधानी दिल्लीत ५७.६७%

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७%, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३% मतदान झाले.

अनंतनाग-राजौरीत ५४.१५%

तिसऱ्या टप्प्यात होणारे मतदान प्रतिकूल हवामानामुळे सहा टप्प्यात मतदान झालेल्या जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरीमध्ये किरकोळ वादावादी वगळता ५४.१५ टक्के मतदान झाले. अनंतनागमध्ये प्रशासनाकडून पीडीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पक्षाच्या नेत्या मुफ्ती मोहम्मद यांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. 

ओडिशात विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात  सरासरी ७०.०४ टक्के मतदान झाले. पोटनिवडणूक झालेल्या हरयाणाच्या कर्नालमध्ये ५७ टक्के, तर उत्तर प्रदेशच्या घैनसारीत ५१.१० टक्के मतदानाची नोंद झाली.

तापमानाचा मतदानावर परिणाम

सहाव्या टप्प्यात मतदान होत असलेल्या बहुतांश राज्यांत हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अंदाज दिला होता. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदार सावलीचा आधार शोधत होते. काहींनी तर सोबत छत्री, दुपट्टाही आणला होता. मतदारांच्या सोयीसाठी केंद्रांवर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे तसेच कुलरची व्यवस्था केली होती. त्यामुळे दुपारच्या वेळी गर्दी ओसरली होती.

राज्यनिहाय मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले आहे. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झालं आहे. तर पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी आज मतदान पूर्ण झाले. हरियाणामध्ये ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. तर राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झालं. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झालं. तर ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढं मतदान झालं आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४west bengalपश्चिम बंगालOdishaओदिशाdelhiदिल्ली