शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 05:55 IST

सहावा टप्पा संपताच देशातील २५ राज्यांतील ४२८ मतदारसंघांतील निवडणूक आटोपली आहे. उर्वरित ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत देशात झालेल्या सर्वच टप्प्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान होण्याची कामगिरी पश्चिम बंगालने सहाव्या टप्प्यातही कायम ठेवली. प्रत्येकवेळी हिंसाचाराच्या घटना घडणाऱ्या बंगालमध्ये मतदान मात्र भरभरून झाले. शनिवारी आठ राज्यांतील ५८ मतदारसंघांत रात्री ११ वाजेच्या आकडेवारीनुसार ६१.०४ टक्के मतदान झाले. त्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९.३५ टक्के, तर सर्वांत कमी ५४.०३ टक्के मतदान उत्तर प्रदेशमध्ये झाले. पहिल्या तीन टप्प्यांचा अपवाद वगळता बंगालमध्ये चौथ्या टप्प्यापासून सर्वाधिक मतदान होत आहे. 

सहाव्या टप्प्यात सर्वाधिक लक्ष लागले होते ते दिल्लीतील मतदानाकडे. प्रखर उन्हाला न जुमानता दिल्लीत  ७ जागांसाठी मतदान झाले. दरम्यान, सहावा टप्पा संपताच देशातील २५ राज्यांतील ४२८ मतदारसंघांतील निवडणूक आटोपली आहे. उर्वरित ५७ जागांसाठी १ जून रोजी मतदान होईल.

राजधानी दिल्लीत ५७.६७%

दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय मंत्र्यांसह अनेक व्हीआयपींनी मतदान केले. दिल्लीत सरासरी ५७.६७ टक्के मतदान झाले. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६२.८७%, तर नवी दिल्लीत सर्वात कमी ५२.९३% मतदान झाले.

अनंतनाग-राजौरीत ५४.१५%

तिसऱ्या टप्प्यात होणारे मतदान प्रतिकूल हवामानामुळे सहा टप्प्यात मतदान झालेल्या जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरीमध्ये किरकोळ वादावादी वगळता ५४.१५ टक्के मतदान झाले. अनंतनागमध्ये प्रशासनाकडून पीडीपीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पक्षाच्या नेत्या मुफ्ती मोहम्मद यांनी जम्मू-श्रीनगर महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. 

ओडिशात विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यात  सरासरी ७०.०४ टक्के मतदान झाले. पोटनिवडणूक झालेल्या हरयाणाच्या कर्नालमध्ये ५७ टक्के, तर उत्तर प्रदेशच्या घैनसारीत ५१.१० टक्के मतदानाची नोंद झाली.

तापमानाचा मतदानावर परिणाम

सहाव्या टप्प्यात मतदान होत असलेल्या बहुतांश राज्यांत हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा अंदाज दिला होता. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर मतदार सावलीचा आधार शोधत होते. काहींनी तर सोबत छत्री, दुपट्टाही आणला होता. मतदारांच्या सोयीसाठी केंद्रांवर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे तसेच कुलरची व्यवस्था केली होती. त्यामुळे दुपारच्या वेळी गर्दी ओसरली होती.

राज्यनिहाय मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले आहे. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झालं आहे. तर पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झाले. हरयाणामधील सर्व १० जागांसाठी आज मतदान पूर्ण झाले. हरियाणामध्ये ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. तर राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झालं. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झालं. तर ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढं मतदान झालं आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४west bengalपश्चिम बंगालOdishaओदिशाdelhiदिल्ली