शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मॅच फिक्सिंग करून निवडणूक जिंकण्याचा हाेताेय प्रयत्न, इंडिया आघाडीच्या महारॅलीत राहुल गांधी यांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 10:25 IST

Lok Sabha Election 2024: पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा  प्रयत्न करीत असल्याचे सारा देश आणि भाजपचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदी मॅच फिक्सिंगने निवडणूक जिंकण्याचा  प्रयत्न करीत असल्याचे सारा देश आणि भाजपचे लोकही बघत आहेत. पंचांवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन बेईमानीने सामना जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक आयोगातील दोन पंचही त्यांनीच निवडले. सामना सुरु होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करुन तुरुंगात टाकले. ही मॅच फिक्सिंग मोदी आणि भारतातील तीनचार सर्वात मोठे उद्योगपती करीत आहेत, अशी टीका काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. 

‘इंडिया’ आघाडीच्या जाहीर सभेत राहुल गांधी बाेलत हाेते. केंद्र सरकारवर टीका करताना ते म्हणाले, मॅच फिक्स करून चारशे जागा जिंकताच आम्ही संविधान बदलू, असे भाजपच्या एका खासदाराने म्हटले. ही लढाई संविधान वाचविण्याची आहे.ही निवडणूक सामान्य नाही. हिंदुस्थान, संविधान, गरीब, शेतकरी, मागासवर्गीय, आदिवासींचे हक्क वाचविण्याची निवडणूक आहे. ज्या दिवशी संविधान संपेल त्या दिवशी हिंदुस्थान वाचणार नाही. तेच त्यांचे लक्ष्य आहे. मॅच फिक्सिंगची निवडणूक जिंकून भाजपने संविधान बदलले तर संपूर्ण देशात आगडोंब उसळेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

केजरीवाल यांच्यासहा गॅरंटीपूर्ण देशात २४ तास वीजपुरवठा, संपूर्ण देशात गरीबांना वीज मोफत, प्रत्येक गावात आणि मोहल्ल्यात शानदार सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनीक, प्रत्येक जिल्ह्यात मल्टी स्पेशालिटी सरकारी इस्पितळे, शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींनुसार भाव, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा.. अशा अरविंद केजरीवाल यांच्या सहा गॅरंटी त्यांच्या पत्नी सुनीता यांनी राजकीय व्यासपीठावर प्रथमच पदार्पण करताना वाचून दाखविल्या.

विरोधकांनी डागली टीकेची तोफमल्लिकार्जुन खरगे - देशात लोकशाही हवी की हुकुमशाही? लोकशाहीच्या, संविधानाच्या देशाच्या रक्षणासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकजूट होऊन, मतभेद विसरुन निवडणूक लढली पाहिजे.अखिलेश यादव -  भाजप हा ब्रह्मांडातील सर्वात खोटारडा पक्ष आहे. निर्वाचित मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठविल्याने केवळ भारतातच नव्हे तर जगभर भाजपची छी थू होत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर करुन सत्ता वाचविण्याचा प्रयत्न केल्यास चारसौ पार नाही तर चार सौ से हार निश्चित आहे.शरद पवार -  केजरीवाल आणि सोरेन यांना करण्यात आलेली अटक ही लोकशाही आणि संविधानावर झालेला हल्ला आहे.तेजस्वी यादव -  अब की बार चारसौ पार ची घोषणा ऐकून असे वाटत आहे की आधीपासूनच ईव्हीेएम सेटिंग झाली आहे.   सीताराम येचुरी -  याच मैदानातून ४७ वर्षांपूर्वी स्वातंत्र्य की गुलामी असा नारा देण्यात आला होता. आज त्याची पुनरावृत्ती होत आहे भगवंत मान -  हम वो पत्ते नाही जो शाख से गिर जायेंगे, आँधीओ को कह दो अपनी औकात रहेकल्पना सोरेन -   भाजपच्या हुकुमशाहीविरुद्ध लढणार आणि जिंकणार.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRahul Gandhiराहुल गांधी