शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नरेंद्र मोदी की राहुल गांधी? PM निवडीबाबत देशवासीयांची ‘मन की बात’; धक्कादायक आकडे समोर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 05:27 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा कल जाणून घेतला जात आहे.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांत प्रचारसभांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया विरुद्ध एनडीए असा मोठा सामना पाहायला मिळू शकतो, असा कयास बांधला जात आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी थेट मतदान करून निवड करायची झाल्यास कोण देशाची पसंती असेल, याबाबत कल जाणून घेण्यात आला. यातील आकडेवारी धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक जिंकून भाजपा तिसऱ्यांदा केंद्रातील सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांची I.N.D.I.A आघाडी भाजपाला शह देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार आहे. विरोधकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, यावर शिक्कामोर्तब केले नसले तरी, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते, असे म्हटले जात आहे. एका सर्व्हेत जनतेला विचारले की, जर थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर ते कोणाला निवडतील? यावर देशवासीयांनी आश्चर्यकारक उत्तरे दिल्याचे बोलले जात आहे. 

नरेंद्र मोदी की राहुल गांधी? PM निवडीबाबत देशवासीयांची ‘मन की बात’

थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल? या प्रश्नाला उत्तर देताना ५९ टक्के लोकांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक संधी देणार असल्याचे सांगितले. तर, ३२ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पसंदी दर्शवली. या दोघांपैकी एकाची निवड करणार नाही, असे ४ टक्के लोकांनी म्हटले आहे. तर, ५ टक्के लोकांनी या प्रश्नाचे उत्तर ‘माहिती नाही’ असे दिल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांच्या कामगिरीबद्दल विचारले असता, ३९ टक्के लोकांनी ‘असमाधानी’ असल्याचे सांगितले. २६ टक्के लोकांनी ‘खूप समाधानी’ असल्याचे म्हटले आहे. तर २१ टक्के लोकांनी ‘कमी समाधानी’ असल्याचे सांगितले. १४ टक्के लोकांनी ‘काही माहिती नाही’ असे उत्तर दिले. सी-व्होटरने याबाबत सर्व्हे केल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा मंत्र देताना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. गरीब, शेतकरी, महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची मते वाढवावीत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. श्रीराम मंदिर आंदोलन भाजपाने हाती घेतलेले मोठे आंदोलन आहे. श्रीराम मंदिराचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक