शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
2
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
3
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
4
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
5
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
6
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
7
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
8
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
9
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
10
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
11
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
12
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
13
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
14
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
15
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
16
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
17
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
18
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
19
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
20
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा

नरेंद्र मोदी की राहुल गांधी? PM निवडीबाबत देशवासीयांची ‘मन की बात’; धक्कादायक आकडे समोर! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 05:27 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचा कल जाणून घेतला जात आहे.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी जोर लावल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांत प्रचारसभांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया विरुद्ध एनडीए असा मोठा सामना पाहायला मिळू शकतो, असा कयास बांधला जात आहे. परंतु, पंतप्रधानपदासाठी थेट मतदान करून निवड करायची झाल्यास कोण देशाची पसंती असेल, याबाबत कल जाणून घेण्यात आला. यातील आकडेवारी धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक जिंकून भाजपा तिसऱ्यांदा केंद्रातील सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांची I.N.D.I.A आघाडी भाजपाला शह देण्यासाठी सर्व ताकद पणाला लावणार आहे. विरोधकांनी पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, यावर शिक्कामोर्तब केले नसले तरी, नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात चुरस पाहायला मिळू शकते, असे म्हटले जात आहे. एका सर्व्हेत जनतेला विचारले की, जर थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर ते कोणाला निवडतील? यावर देशवासीयांनी आश्चर्यकारक उत्तरे दिल्याचे बोलले जात आहे. 

नरेंद्र मोदी की राहुल गांधी? PM निवडीबाबत देशवासीयांची ‘मन की बात’

थेट पंतप्रधान निवडायचा असेल तर तुम्ही कोणाला निवडाल? या प्रश्नाला उत्तर देताना ५९ टक्के लोकांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणखी एक संधी देणार असल्याचे सांगितले. तर, ३२ टक्के लोकांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी पसंदी दर्शवली. या दोघांपैकी एकाची निवड करणार नाही, असे ४ टक्के लोकांनी म्हटले आहे. तर, ५ टक्के लोकांनी या प्रश्नाचे उत्तर ‘माहिती नाही’ असे दिल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांच्या कामगिरीबद्दल विचारले असता, ३९ टक्के लोकांनी ‘असमाधानी’ असल्याचे सांगितले. २६ टक्के लोकांनी ‘खूप समाधानी’ असल्याचे म्हटले आहे. तर २१ टक्के लोकांनी ‘कमी समाधानी’ असल्याचे सांगितले. १४ टक्के लोकांनी ‘काही माहिती नाही’ असे उत्तर दिले. सी-व्होटरने याबाबत सर्व्हे केल्याचे म्हटले जात आहे. 

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा मंत्र देताना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवायची आहेत. गरीब, शेतकरी, महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून पक्षाची मते वाढवावीत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. श्रीराम मंदिर आंदोलन भाजपाने हाती घेतलेले मोठे आंदोलन आहे. श्रीराम मंदिराचा मुद्दा २०२४ च्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.  

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक