शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 06:05 IST

Indresh Kumar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून (Lok Sabha Election 2024 Result ) भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने (RSS) भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे. ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे सत्तेबाहेर बसले आहेत, असं विधान इंद्रेश कुमार यांनी केलं आहे. याआधीच्या वक्तव्यावरून खूप वाद झाल्यानंतर इंद्रेश कुमार म्हणाले की, सध्या देशातील वातावरण खूप स्पष्ट आहे. ज्यांनी रामाला विरोध केला ते सत्तेबाहेर आहेत आणि ज्यांनी राम भक्तीचा संकल्प केला ते आज सत्तेत आहेत. तसेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश चौफेर प्रगती करेल, असा विश्वास जनमानसामध्ये निर्माण झालेला आहे. तसेच हा विश्वास असाच वृद्धिंगत व्हावा, अशा आम्ही शुभेच्छा देतो.दरम्यान, १३ जून रोजी कानोता येथे राम रथ अयोध्या यात्रा दर्शन पूजा समारंभाला संबोधिक करताना इंद्रेश कुमार भाजपाबाबत म्हणाले होते की,  ज्या पक्षाने श्री रामाची भक्ती केली, मात्र ते अहंकारी झाले. त्यांना २४१ वर रोखलं गेलं. मात्र त्यांना सर्वात मोठा पक्ष बनवण्यात आलं. त्यांना जो पूर्ण हक्क मिळाला पाहिजे होता. जी शक्ती मिळायला हवी होती, ती देवाने अहंकारामुळे दिली नाही. तर ज्यांची श्री रामावर कुठल्याही प्रकारची श्रद्धा नव्हती. त्यांना एकत्रितपणे २३४ जागांवर रोखले. सगळे एकत्र मिळूनही पहिलं स्थान मिळवू शकले नाहीत. दुसऱ्या स्थानावरच त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे देवाचा न्याच विचित्र नाही आहे, तर सत्य आहे, खूप आनंददायी आहे, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले होते. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावरून भाजपाला टोला लगावला होता. ते म्हणाले की, इंद्रेश कुमार हे संघाचे बडे नेते आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अहंकार आणि मणिपूरवरून भाष्य केलं होतं. भाजपाचे दोन बडे नेते अहंकारी झाले आहेत. आरएसएस आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. या लोकांना १० वर्षांमध्ये का रोखण्यात आलं नाही. संघाच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी ही विधानं का केली नाहीत, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी