शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा किती जागा लढवणार? अशी आहे आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:31 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्याचं आव्हान भाजपासमोर आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळवण्याचं लक्ष्य  भाजपाने आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यामुळे भाजपा या निवडणुकीत किती जागा लढवणार याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे. दरम्यान, भाजपाने जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला असून, त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजपा यावेळी मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागांवर लढण्याची शक्यता आहे. 

गेल्या निवडणुकीत एनडीएच्या माध्यमातून सोबत असलेल्या पक्षांपैकी अनेक मोठ्या पक्षांनी भाजपाची साथ सोडली आहे. जेडीयू, शिवसेना, अण्णा द्रमुक, अकाली दल हे मित्रपक्ष भाजपाला सोडून गेले आहेत. त्यामुळे भाजपाला अधिकाधिक जागांवर लढावे लागणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट, कर्नाटकमध्ये जनता दल सेक्युलर असे काही मित्रपक्ष भाजपाला मिळालेले आहेत. मात्र या मित्रपक्षांना काही जागा सोडूनही आपला जनाधार वाढवण्याची संधी भाजपाकडे असणार आहे. 

भाजपाने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात कमी २२५ उमेदवार हे १९८९ मध्ये  झालेल्या लोकसभा निवडणुकीत उतरवले होते. तर सर्वाधिक ४७७ उमेदवारांना १९९१ मध्ये उमेदवारी दिली होती. पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांचा आकडा कमी होत गेला होता. १९९९ मध्ये भाजपाने ३३९ जागांवर निवडणूक लढवून त्यातील १८२ जागा जिंकल्या होत्या.  २०१४ मध्ये भाजपाने ४२८  जागांवर निवडणूक लढवताना २८२  जागा जिंकल्या होत्या. केंद्रात स्पष्ट बहुमत मिळवण्याची भाजपाची ही पहिलीच वेळ होती. तर २०१९ मध्ये भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवताना ३०३ जागांवर विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा तब्बल ६९.५ टक्क्यांवर पोहोचला होता.

२०१९ च्या निवडणुकीत  भाजपाच्या विजयाची सरासरी ही २०१४ पेक्षाही अधिक होती. २०१४ मध्ये भाजपाने ४२८ तर २०२९ मध्ये ४३६ जागा लढवल्या होत्या. म्हणजेच २०१४ च्या तुलनेत भाजपाने ८ जागा लढवल्या होत्या. तर २१  अधिक जागा जिकंल्या होत्या.  त्यामुळे यावेळी भाजपा २०१९ च्या तुलनेत अधिक जागा लढवणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र त्याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. तसेच अधिकाधिक जागा स्वबळावर जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी