शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

काँग्रेसचे 'राहुलयान' न लॉन्च होऊ शकते ना लँड...राजनाथ सिंह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 15:00 IST

Lok Sabha Election 2024: भाजपचे दिग्गज नेते राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये प्रचारसभेतून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. उद्या म्हणजेच, शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी 2019 च्या निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले, त्यामुळेच यावेळी त्यांच्यात या मततारसंघातून निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली.

राजनाथ सिंह भाजपचे उमेदवार अनिल के अँटोनी यांच्या प्रचारासाठी केरळमध्ये आले होते. यावेळी प्रचारसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणतात, पराभवामुळेच राहुल गांधी उत्तर प्रदेशातून केरळला पळून आले. पण, आता मी असे ऐकले आहे की, यंदा वायनाडच्या जनतेने राहुल गांधींना खासदार न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज देशात विविध स्पेस प्रोग्राम आणि प्रोजेक्ट्स लॉन्च केले जात आहेत, पण गेल्या 20 वर्षांत काँग्रेसचे युवा नेते त्यांना 'लाँच' होऊ शकले नाहीत. काँग्रेस पक्षाचे 'राहुलयान' ना लॉन्च होऊ शकते, ना कुठे लँड होऊ शकते, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचे कौतुक केले आणि त्यांचे शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणून वर्णन केले. तसेच, त्यांच्या प्रामाणिकपणावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही, असेही म्हणाले. याशिवाय, आपल्याच मुलाचा पराभव व्हावा, या त्यांच्या वक्तव्यामुळे आपण आश्चर्यचकित झाल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. मला माहित आहे की ते (ए. के. अँटनी) तत्त्वनिष्ठ व्यक्ती आहेत आणि मी त्यांची मजबुरी जणतो. भाजपमध्ये असलेल्या मुलाला पाठिंबा देणे, त्यांना अवघड आहे. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही मुलाला मत देऊ नका, पण तुमचा आशिर्वाद त्याच्यासोबत असू द्या. 

टॅग्स :kerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024Rajnath Singhराजनाथ सिंहRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election Major Fightsलोकसभा निवडणूक टफ फाइट्स