शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:28 IST

Cm Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी समोर येणार आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीला यांनी मोठं विधान केलं आहे.

Cm Arvind Kejriwal ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून ४ जून रोजी निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. इंडिया आघाडी तसेच एनडीच्या जोरदार सभा सुरू आहेत. इंडिया आघाडीला आम आमदी पक्षानेही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, निकालावरुन अनेक नेत्यांनी दावे केले आहेत. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'इंडिया टुडेला' दिलेल्या मुलाखतीत निकालावरुन तसेच काँग्रेससोबत केलेल्या आघाडीवरुन वक्तव्य केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल

यावेळी सीएम केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला. केजरीवाल पंजाबमधील लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच गोष्टींवर भाष्य केले.यावेळी केजरीवाल यांना आम आदमी पक्षाची काँग्रेससोबतची युती किती दिवस टिकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले,  आम्ही लग्न केलेले नाही. आमचे लग्न झालेले नाही. अरेंज मॅरेजही झालेले नाही, प्रेमविवाह झाला नाही. देश वाचवण्यासाठी ४ जूनपर्यंत निवडणूक लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्याला नाव देण्याची काय गरज आहे? भाजपला पराभूत करणे हे सध्या आमचे ध्येय आहे, असंही केजरीवाल म्हणाले.

काँग्रेससोबत दिल्ली-चंदीगड आणि पंजाबमध्ये वेगळी निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, यावेळी देश वाचवणे आवश्यक आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी जिथे एकत्र यावे लागले तिथे आम्ही एकत्र आलो. जेणेकरून भाजपच्या विरोधात उमेदवार देता येईल. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे पंजाबमध्ये आम्ही वेगळे लढत आहोत. ४ जूननंतर पुढे काय करायचे ते ठरवू. यावेळी देशाचे संविधान व लोकशाही वाचवणे गरजेचे आहे. जनतेने आमच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, असंही केजरीवाल म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने दिल्लीतील सातही जागांवर युती करुन निवडणूक लढवली. चंदीगडमध्येही आप- काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांना पाठिंबा देत आहे. मात्र,पंजाब राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

'मी घाबरणार नाही'

अरविंद केजरीवाल म्हणाले, मी घाबरणार नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा तुरुंगात जाणे माझ्यासाठी मुद्दा नाही नाही. या देशाचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते मला तुरुंगात टाकू शकतात, मी घाबरणार नाही. भाजपला हेच हवे आहे, त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असंही सीएम केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप