शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 15:28 IST

Cm Arvind Kejriwal : लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी समोर येणार आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीला यांनी मोठं विधान केलं आहे.

Cm Arvind Kejriwal ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून ४ जून रोजी निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. इंडिया आघाडी तसेच एनडीच्या जोरदार सभा सुरू आहेत. इंडिया आघाडीला आम आमदी पक्षानेही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, निकालावरुन अनेक नेत्यांनी दावे केले आहेत. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'इंडिया टुडेला' दिलेल्या मुलाखतीत निकालावरुन तसेच काँग्रेससोबत केलेल्या आघाडीवरुन वक्तव्य केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल

यावेळी सीएम केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला. केजरीवाल पंजाबमधील लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच गोष्टींवर भाष्य केले.यावेळी केजरीवाल यांना आम आदमी पक्षाची काँग्रेससोबतची युती किती दिवस टिकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले,  आम्ही लग्न केलेले नाही. आमचे लग्न झालेले नाही. अरेंज मॅरेजही झालेले नाही, प्रेमविवाह झाला नाही. देश वाचवण्यासाठी ४ जूनपर्यंत निवडणूक लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्याला नाव देण्याची काय गरज आहे? भाजपला पराभूत करणे हे सध्या आमचे ध्येय आहे, असंही केजरीवाल म्हणाले.

काँग्रेससोबत दिल्ली-चंदीगड आणि पंजाबमध्ये वेगळी निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, यावेळी देश वाचवणे आवश्यक आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी जिथे एकत्र यावे लागले तिथे आम्ही एकत्र आलो. जेणेकरून भाजपच्या विरोधात उमेदवार देता येईल. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे पंजाबमध्ये आम्ही वेगळे लढत आहोत. ४ जूननंतर पुढे काय करायचे ते ठरवू. यावेळी देशाचे संविधान व लोकशाही वाचवणे गरजेचे आहे. जनतेने आमच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, असंही केजरीवाल म्हणाले. 

लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने दिल्लीतील सातही जागांवर युती करुन निवडणूक लढवली. चंदीगडमध्येही आप- काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांना पाठिंबा देत आहे. मात्र,पंजाब राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

'मी घाबरणार नाही'

अरविंद केजरीवाल म्हणाले, मी घाबरणार नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा तुरुंगात जाणे माझ्यासाठी मुद्दा नाही नाही. या देशाचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते मला तुरुंगात टाकू शकतात, मी घाबरणार नाही. भाजपला हेच हवे आहे, त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असंही सीएम केजरीवाल म्हणाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप