शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 11:55 IST

Lok Sabha Election 2024: लखनौमध्ये आज सकाळी सपा आणि आप यांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये स्वाती मालिवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे अरविंद केजरीवाल यांची अडचण झाल्याचे दिसून आले. स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगणे पसंद केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनावरून सध्या आम आदमी पक्षाची चांगलीच कोंडी झालेली आहे. लखनौमध्ये आज सकाळी सपा आणि आप यांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्येही स्वाती मालिवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे अरविंद केजरीवाल यांची अडचण झाल्याचे दिसून आले. या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होईल, असा दावा केला. मात्र स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगणे पसंद केले. तर यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे सांगत अखिलेश यादव यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.

स्वाती मालिवाल यांच्या प्रश्नावरून दोन्ही नेत्यांची अडचण झाली असताना संजय सिंह यांनी माईक सांभाळला. तसेच या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपावरच प्रश्व उपस्थित केले. मणिपूरपासून ते प्रज्वल रेवण्णांपर्यंतच्या प्रश्नावर भाजपानं उत्तर दिलं पाहिजे, असे संजय सिंह यांनी सांगितले.

संजय सिंह म्हणाले की, आम आदमी पार्टी आमचं कुटुंब आहे. पार्टीने आपली बाजू मांडली आहे. देशातील जेवढे मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानं उत्तर दिलं पाहिजे. स्वाती मालिवाल ह्या जेव्हा कुस्तीपटूंशी चर्चा करण्यासाठी जंतर मंतर येथे गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं होतं. भाजपानं यावर उत्तर दिलं पाहिजे. दरम्यान, स्वाती मालिवाल यांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी राजकारणात करता कामा नये, भाजपानं मणिपूरवरून उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी संजय सिंह यांनी केली.

संजय सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये जे काही घडलं, ते पाहून संपूर्ण देशाला वेदना झाल्या होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर मौन बाळगून होते. प्रज्ज्वल रेवण्णा यांनी हजारो महिलांवर बलात्कार केला. मात्र नरेंद्र मोदी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यासाठी मतं मागत होते. जेव्हा आमचे कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलन करत होते. तेव्हा डीसीडब्ल्यूच्या तत्कालीन प्रमुख स्वाती मालिवाल यांना पोलिसांनी मारहाण केली होती. मात्र या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. आम आदमी पक्ष हे आमचं कुटुंब आहे. तसेच आम्ही त्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी मी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर उत्तरं दिली पाहिजेत. स्वाती मालिवाल यांच्या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये, असं आवाहन संजय सिंह यांनी केलं.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४