शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
3
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
4
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
5
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
6
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
7
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
8
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
9
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
10
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
11
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
12
इस्त्रायलच्या सुंदर तरुणी सैनिक का बनतात? 
13
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
14
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
15
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
16
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
17
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
18
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
19
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
20
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 11:55 IST

Lok Sabha Election 2024: लखनौमध्ये आज सकाळी सपा आणि आप यांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये स्वाती मालिवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे अरविंद केजरीवाल यांची अडचण झाल्याचे दिसून आले. स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगणे पसंद केले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनावरून सध्या आम आदमी पक्षाची चांगलीच कोंडी झालेली आहे. लखनौमध्ये आज सकाळी सपा आणि आप यांच्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्येही स्वाती मालिवाल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नामुळे अरविंद केजरीवाल यांची अडचण झाल्याचे दिसून आले. या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होईल, असा दावा केला. मात्र स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी मौन बाळगणे पसंद केले. तर यापेक्षा अधिक महत्त्वाचे मुद्दे आहेत, असे सांगत अखिलेश यादव यांनी हा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.

स्वाती मालिवाल यांच्या प्रश्नावरून दोन्ही नेत्यांची अडचण झाली असताना संजय सिंह यांनी माईक सांभाळला. तसेच या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या भाजपावरच प्रश्व उपस्थित केले. मणिपूरपासून ते प्रज्वल रेवण्णांपर्यंतच्या प्रश्नावर भाजपानं उत्तर दिलं पाहिजे, असे संजय सिंह यांनी सांगितले.

संजय सिंह म्हणाले की, आम आदमी पार्टी आमचं कुटुंब आहे. पार्टीने आपली बाजू मांडली आहे. देशातील जेवढे मुद्दे आम्ही उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपानं उत्तर दिलं पाहिजे. स्वाती मालिवाल ह्या जेव्हा कुस्तीपटूंशी चर्चा करण्यासाठी जंतर मंतर येथे गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आलं होतं. भाजपानं यावर उत्तर दिलं पाहिजे. दरम्यान, स्वाती मालिवाल यांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी राजकारणात करता कामा नये, भाजपानं मणिपूरवरून उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी संजय सिंह यांनी केली.

संजय सिंह म्हणाले की, मणिपूरमध्ये जे काही घडलं, ते पाहून संपूर्ण देशाला वेदना झाल्या होत्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यावर मौन बाळगून होते. प्रज्ज्वल रेवण्णा यांनी हजारो महिलांवर बलात्कार केला. मात्र नरेंद्र मोदी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्यासाठी मतं मागत होते. जेव्हा आमचे कुस्तीपटू जंतर मंतरवर आंदोलन करत होते. तेव्हा डीसीडब्ल्यूच्या तत्कालीन प्रमुख स्वाती मालिवाल यांना पोलिसांनी मारहाण केली होती. मात्र या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले. आम आदमी पक्ष हे आमचं कुटुंब आहे. तसेच आम्ही त्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी मी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर उत्तरं दिली पाहिजेत. स्वाती मालिवाल यांच्या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये, असं आवाहन संजय सिंह यांनी केलं.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४delhiदिल्लीAam Admi partyआम आदमी पार्टीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi lok sabha election 2024दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल २०२४