शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

Lok Sabha Election 2019 : अबकी बार भाजपा 300 तर एनडीए 400 पार - योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 09:47 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.उत्तर प्रदेशमध्ये एकट्या भाजपला 74 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 

गोरखपूर - सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या मतदानाला रविवारी (19 मे) सुरुवात झाली आहे.  मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे 10 कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत. गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या साथीने राष्ट्रीय लोकशाही आघाडी 400 जागांचा टप्पा पार करेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

योगी आदित्यनाथ यांनी भारतीय जनता पक्षाला 300 जागा मिळतील, तर घटक पक्षांच्या मदतीने एनडीएला 400 जागा मिळतील. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या महागठबंधनाचा फारसा परिणाम एनडीएच्या जागांवर पडणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये एकट्या भाजपाला 74 जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 

मतदान करण्यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 'देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून गोरखपूर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. आपणही आळस न करता मतदान करण्यासाठी घराबाहेर पडावे' असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून केले आहे.

सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे. मतदान आटोपताच विविध वृत्तवाहिन्यांवर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष दाखवण्यास सुरुवात होईल. त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडेच असेल. राजकीय नेते त्यावर आपली मते व्यक्त करतील. पण 23 मे रोजी प्रत्यक्ष निकाल लागेपर्यंत राजकीय पक्ष, त्यांचे नेते व प्रत्यक्ष उमेदवार यांच्या मनात प्रचंड धाकधूक असेल.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Uttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान