शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : पूर्वोत्तर भारतातही भाजपाची मुसंडी, 14 जागांवर घेतली आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:42 IST

पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये भाजपा आणि आसाम गण परिषद 9 जागांवर आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देपूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये भाजपा आणि आसाम गण परिषद 9 जागांवर आघाडीवर आहेत. अरूणाचल प्रदेशमध्ये 2, मणिपूरमध्ये 1,  त्रिपुरामध्ये 2 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे.पूर्वोत्तर भारतातील 25 जागा भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहेत. 

नवी दिल्ली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या राज्यांसोबतच पूर्वोत्तर भारतातील छोटी छोटी राज्येही चर्चेत राहिली. त्याला कारण ठरले ते म्हणजे गेल्या लोकसभा  निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने राजकीयदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या या भागावर केंद्रित केलेले लक्ष. काही वर्षांपूर्वी पूर्वोत्तर भारतात नाममात्र असलेल्या भाजपाने मागच्या पाच  वर्षांमध्ये स्थानिक पक्षांशी आघाड्या करत अनेक राज्यांमध्ये सत्ता प्राप्त केली आहे. मात्र नागरिकत्व कायद्यामुळे या भागात भाजपाविरोधात नाराजी आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत लोकसभेच्या 25 जागा असलेल्या पूर्वोत्तर भाजपाला यश मिळते की या भागात बँकफूटवर गेलेली काँग्रेस आणि स्थानिक पक्ष कमबँक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आलेल्या कलांमध्ये पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये भाजपा आणि आसाम गण परिषद 9 जागांवर आघाडीवर आहेत. तर अरूणाचल प्रदेशमध्ये 2, मणिपूरमध्ये 1,  त्रिपुरामध्ये 2 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट आघाडीवर आहे. पूर्वोत्तर भारतात आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या सात राज्यांचा समावेश होतो. पैकी एकट्या आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. तर उर्वरित सहा राज्यांत 11 जागा आहेत. पूर्वोत्तर भारतातील 25 जागा भाजपा आणि काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण आहेत. 

आसाम (14) 

आसाममध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत. भाजपाने 2014 मध्ये 7 जागा जिंकून बाजी मारली होती. तर भाजपाच्या मतांमध्ये सुमारे 20 टक्के वाढ होऊन ती 36.5 टक्के झाली. तसेच काँग्रेसची मते सुमारे 4.5 टक्क्यांनी कमी होऊन त्यांना तीन जागा मिळाल्या होत्या.

अरुणाचल प्रदेश (2)

अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. भाजपा आणि काँग्रेसने 2014 मध्ये प्रत्येकी एक जागा जिंकली होती. मात्र यावेळी भाजपाने दोन्ही जागा जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. आसाममध्ये भाजपाचे सर्वानंद सोनोवाल मुख्यमंत्री असून, त्यात बीपीएफ व एजीपी (आसाम गण परिषद) आहे.

मणिपूर (2)

मणिपूरमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. दोन निवडणुकींमध्ये या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले एन बिरेन सिंग मणिपुरमध्ये मुख्यमंत्री असले तरी सत्तेत एनपीपी, एनपीएफ व एलजेपी यांचा सहभाग आहे.

मिझोराम  (1)

मिझोराममध्ये लोकसभेची एक जागा आहे. लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती. मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे झोरामथंगा मुख्यमंत्री असून, त्या सरकारमध्ये भाजपा आहे.

मेघालय (2) 

मेघालयमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहे. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने एक जागा तर स्थानिक पक्षाने एक जागा  जिंकली होती. मेघालयमध्ये एनपीपीचे कोनराड संगमा मुख्यमंत्री असून, त्या सरकारमध्ये भाजपा व अन्य तीन प्रादेशिक पक्ष आहेत. 

नागालँड (1) 

नागालँडमध्ये लोकसभेची एक जागा आहे. स्थानिक एनपीएफ या पक्षाला सलग दोन निवडणुकांमध्ये याआधी विजय मिळाला आहे. नागालँडमध्ये एनडीडीपीच्या नैफिऊ रिओ मुख्यमंत्री आहेत आणि सत्तेत भाजपा, जनता दल (संयुक्त) व नॅशनल पीपल्स फ्रंट (एनपीपी) आहे. 

सिक्कीम (1) 

सिक्कीममध्ये लोकसभेची एक जागा आहे. 2014 च्या निवडणुकीत ही जागा स्थानिक एसडीएफ या पक्षाला मिळाली होती. सिक्किममध्ये सिक्किम डेमॉक्रेटिक फ्रंटचे पवनकुमार चामलिंग ही भाजपच्या नेडामध्ये आहेत.

त्रिपुरा (2) 

त्रिपुरामध्ये लोकसभेच्या 2 जागा आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या जागा सीपीएमला मिळाल्या होत्या. त्रिपुरात भाजपाचे बिप्लब देव मुख्यमंत्री आहेत, पण त्या सरकारमध्येही आयपीएफटी हा पक्ष आहे.

 

टॅग्स :Assam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019Arunachal Pradesh Lok Sabha Election 2019अरुणाचल प्रदेश लोकसभा निवडणूक 2019Manipur Lok Sabha Election 2019मणिपुर लोकसभा निवडणूक 2019Mizoram Lok Sabha Election 2019मिझोरम लोकसभा निवडणूक 2019Sikkim Lok Sabha Election 2019सिक्किम लोकसभा निवडणूक 2019Tripura Lok Sabha Election 2019त्रिपुरा लोकसभा निवडणूक निकाल 2019Meghalaya Lok Sabha Election 2019मेघालय लोकसभा निवडणूक 2019nagaland-pcनागालँड