शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

युती फिसकटल्यानंतर केजरीवाल यांची शीला दिक्षित यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 13:20 IST

लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युतीसाठी दीक्षित इच्छूक नसून काँग्रेसचे इतर नेते युतीसाठी उत्सुक आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीत काँग्रेससोबतची युतीची बोलणी फिसकटल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांच्यावर हल्लाबोल केला. याआधी दीक्षित यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या केजरीवाल यांनी दीक्षित यांच्यामुळेच दिल्लीची वाईट स्थिती झाल्याचे म्हटले. लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत आम आदमी पक्षासोबत युतीसाठी दीक्षित इच्छूक नसून काँग्रेसचे इतर नेते युतीसाठी उत्सुक आहेत.

भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही पक्षांनी मागील ७० वर्षांत केवळ भ्रष्टाचार केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. देशातील स्थिती बदलण्यासाठीच मला आम आदमी पक्षाची स्थापन करावी लागल्याचे त्यांनी सांगितले. मागील ७० वर्षांत काँग्रेस आणि भाजपने केवळ आपले घर भरले. तर मागील चार वर्षात मोदी सरकारने दिल्लीत आम्हाला काम करण्यापासून रोखले. यामुळे केवळ जनतेचे नुकसान झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा आवश्यक असून त्यासाठी दिल्लीतील आपच्या सर्व जागा निवडून देण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी केजरीवाल यांनी दिल्लीत तीन सभा घेतल्या. यामध्ये रोहिनी, मोतीनगर आणि चांदनीचौक येथील सभांचा समावेश होता.

दरम्यान आप आणि काँग्रेस यांच्या युतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील प्रयत्न केले होते. परंतु, त्याला फारसे यश आले नाही. त्यामुळे 'आप' आणि काँग्रेसची युतीची बोलणी पुन्हा फिसकटल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेस