शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

lok Sabha Election 2019: विरोधकांकडून ईव्हीएमवर पुन्हा संशय, निवडणूक प्रक्रियेवर व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 16:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडतंय. 17 राज्यातील 116 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. मात्र या मतदान दरम्यान अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडतंय. 17 राज्यातील 116 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. मात्र या मतदान दरम्यान अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पक्ष, तेलुगुदेशम पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ईव्हीएममध्ये होणाऱ्या बिघाडावरुन टीका केली आहे. ईव्हीएममध्ये बिघाड आहे की भाजपाला मतदान आहे असा प्रस्न त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊनही ईव्हीएम यंत्रणेत बिघाड कशाने होत आहे. निवडणुकीवर 50 हजार करोड खर्च केले जातात. मग अशाप्रकारे बेजबाबदार का? असं अखिलेश यादव यांनी सांगितले आहेत. 

तर दुसरीकडे आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. जगभरातील 191 देशांपैकी फक्त 18 देश ईव्हीएमवर निवडणुका घेत आहेत. तर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही ईव्हीएम मशीनसोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅटवर 50 टक्के पावती दिसत नसल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी कोणत्याही मतदाराला मतदान केलं तरी भाजपाला मतदान होत असल्याचा आरोप केला. गोवामध्ये आम्ही पडताळणी केली तेव्हा 4 पक्षाला प्रत्येकी 9-9 मतं टाकण्यात आली त्यानंतर चौकशीत भाजपाला 17 मतं पडल्याचं दिसून आलं असा दावा केला. 

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी सांगितले की, मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते असं शरद पवारांनी सांगितले.  मंगळवारी मुंबईत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल पटेल आदींसह आप, तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम सीपीआय या पक्षांचे नेते उपस्थित होते. या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आली. 

आयकर विभाग, ईडी या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जातो.रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरु असून प्रत्येक सरकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती आहे. सरकारी संस्थांचा दुरुपयोग करुन विरोधकांच्या घरावर छापे पाडण्यात येतात. त्यामुळे ईव्हीएमबाबतही शंका येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित होऊन त्याचा मतदारांवर परिणाम होईल असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारElectionनिवडणूकChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAkhilesh Yadavअखिलेश यादव