शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

lok Sabha Election 2019: विरोधकांकडून ईव्हीएमवर पुन्हा संशय, निवडणूक प्रक्रियेवर व्यक्त केली शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 16:34 IST

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडतंय. 17 राज्यातील 116 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. मात्र या मतदान दरम्यान अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडतंय. 17 राज्यातील 116 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. मात्र या मतदान दरम्यान अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे. समाजवादी पार्टी, आम आदमी पक्ष, तेलुगुदेशम पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या अनेक विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ईव्हीएममध्ये होणाऱ्या बिघाडावरुन टीका केली आहे. ईव्हीएममध्ये बिघाड आहे की भाजपाला मतदान आहे असा प्रस्न त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊनही ईव्हीएम यंत्रणेत बिघाड कशाने होत आहे. निवडणुकीवर 50 हजार करोड खर्च केले जातात. मग अशाप्रकारे बेजबाबदार का? असं अखिलेश यादव यांनी सांगितले आहेत. 

तर दुसरीकडे आंध्र प्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. जगभरातील 191 देशांपैकी फक्त 18 देश ईव्हीएमवर निवडणुका घेत आहेत. तर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनीही ईव्हीएम मशीनसोबत असणाऱ्या व्हीव्हीपॅटवर 50 टक्के पावती दिसत नसल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाचे संजय सिंह यांनी कोणत्याही मतदाराला मतदान केलं तरी भाजपाला मतदान होत असल्याचा आरोप केला. गोवामध्ये आम्ही पडताळणी केली तेव्हा 4 पक्षाला प्रत्येकी 9-9 मतं टाकण्यात आली त्यानंतर चौकशीत भाजपाला 17 मतं पडल्याचं दिसून आलं असा दावा केला. 

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी सांगितले की, मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो. लोकांना बदल हवा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला विजयाची खात्री आहे. पण ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती आम्हाला वाटते असं शरद पवारांनी सांगितले.  मंगळवारी मुंबईत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चंद्राबाबू नायडू, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल पटेल आदींसह आप, तृणमूल काँग्रेस, डीएमके, सीपीएम सीपीआय या पक्षांचे नेते उपस्थित होते. या संयुक्त पत्रकार परिषदेत विरोधकांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आली. 

आयकर विभाग, ईडी या दोन्ही यंत्रणांचा सरकारकडून वापर केला जातो.रिझर्व्ह बँकेतही हस्तक्षेप सुरु असून प्रत्येक सरकारी यंत्रणेत अशीच परिस्थिती आहे. सरकारी संस्थांचा दुरुपयोग करुन विरोधकांच्या घरावर छापे पाडण्यात येतात. त्यामुळे ईव्हीएमबाबतही शंका येते. गेल्या काही दिवसांमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित होऊन त्याचा मतदारांवर परिणाम होईल असा आरोप विरोधकांनी केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारElectionनिवडणूकChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAkhilesh Yadavअखिलेश यादव