शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सत्ता स्थापनेपूर्वीच संघाचा 'जय श्रीराम'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 12:50 IST

भाजपच्या काळात राम मंदिर होईल अशी अपेक्षा असल्याचे अनेकवेळा मोहन भागवत यांनी बोलवून दाखवले होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मागे पडलेला राम मंदिराचा मुद्दा, निवडणूक होताच पुन्हा चर्चेत आला आहे. रामाचं काम करायचं आहे आणि हे काम होणारच. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालकमोहन भागवत यांनी म्हंटले आहे. राजस्थानच्या उदयपुर येथील दौऱ्यावर असताना  राम मंदिरावर विचारेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते  म्हणाले.

मागील पाच वर्षात आरएसएसने भाजपवर राम मंदिर बाबतीत दबाव आणला. भाजपच्या काळात राम मंदिर होईल अशी अपेक्षा असल्याचे अनेकवेळा मोहन भागवत यांनी बोलवून दाखवले होते. मात्र, राम मंदिराचा विषय न्यायालयीन प्रकरण असल्याचे सांगत भाजपने लोकसभा निवडणुकीत यापासून दोन हात लांब राहणे पसंद केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला आलेल्या यशानंतर पहिल्यांदाच राम मंदिर विषयी मोहन भागवत यांनी अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आता प्रभू रामाचं काम करायचं आहे, रामाचं काम होणारच आणि त्यावर देखरेखही केली जाईल, असं वक्तव्य भागवत यांनी केलं आहे.

प्रभू रामाचं काम करणं म्हणजे आपलंच काम करण्यासारखं आहे. आपलं काम आपण स्वत: केलं तर ते चांगलं होतं. ते दुसऱ्यांवर सोपवलं तर त्यावर लक्ष ठेवावं लागतं, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत आल्यानंतर राम मंदिराची पुन्हा आठवण करून देण्यासाठीच भागवत असे म्हणाले असल्याची चर्चा आहे. २०१४ मध्ये  भाजप सत्तेत आल्यानंतरही राम मंदिरा बाबत मोदींनी अपेक्षीत भूमिका घेतली नसल्याने संघाने उघड नाराजी व्यक्त केली होती.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Mohan Bhagwatमोहन भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीRam Mandirराम मंदिर